डॉ. आनंद गोरे, डॉ. गणेश गायकवाड Farmer Advice: या वर्षी सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोड्या कमी प्रमाणातील पावसाचे प्रमाण दिले असून जुलै आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कुठे कमी तर कुठे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मॉन्सूनचे १५ जून ते ७ जुलै दरम्यान आगमन झाल्यास सर्व खरीप पिके घेता येतात. परंतु मॉन्सून ३० जूनपर्यंत किंवा ७ जुलै पर्यंत आला नाही, म्हणजे पावसात एक आठवड्याने उशीर झाल्यास मात्र काही पिकांमध्ये बदल करावे लागतील. पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन खरीप पेरणीचे नियोजन महत्त्वाचे आहे. .पावसाच्या आगमनानुसार पिकांची निवड आणि पेरणी करावी. पावसाचे आगमन लांबल्यास काही पिकांची पेरणी कमी करून इतर पिकांची निवड पेरणीसाठी करावी. मॉन्सूनचे १५ जून ते ७ जुलै दरम्यान आगमन झाल्यास सर्व खरीप पिके घेता येतात. परंतु मॉन्सून ३० जूनपर्यंत किंवा ७ जुलैपर्यंत आला नाही, म्हणजे पावसात एक आठवड्याने उशीर झाल्यास मात्र काही पिकांमध्ये बदल करावे लागतील. उदा. पाऊस ८ जुलैपर्यंत पाऊस लांबला आणि त्याचे आगमन ८ जुलै ते १५ जुलैदरम्यान झाल्यास मूग, उडीद, भुईमूग पिकांऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल ही पिके घ्यावी लागतील..Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात.उशिरा पावसाच्या काळातील नियोजनया वर्षी सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोड्या कमी प्रमाणातील पावसाचे प्रमाण दिले असून, जुलै आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कुठे कमी तर कुठे चांगल्या पावसाचा अंदाज आहे.मॉन्सूनचे १५ जून ते ७ जुलै दरम्यान आगमन झाल्यास सर्व खरीप पिके घेता येतात. परंतु मॉन्सून ३० जूनपर्यंत किंवा ७ जुलैपर्यंत आला नाही, म्हणजे पावसात एक आठवड्याने उशीर झाल्यास मात्र काही पिकांमध्ये बदल करावे लागणार आहेत..पावसास दोन ते तीन आठवडे उशीर झाल्यास म्हणजे पावसाचे आगमन १६ जुलै ते ३१ जुलै दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग व कपाशी या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, कारळा, तीळ या पिकांबरोबरच सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एरंडी + धने, एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. विशेष करून सोयाबीन आणि कपाशी या महत्त्वाच्या पिकांची पेरणी किंवा लागवड उत्पादनात घट येईल, हे गृहीत धरून उशिरात उशीरा ३१ जुलैपर्यंत करावी, त्यानंतर या पिकांची पेरणी किंवा लागवड करू नये..पावसाचे आगमन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग व कपाशी या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ, धने या पिकांबरोबरच एरंडी + धने, एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल.पावसाचे आगमन १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, तीळ व कपाशी या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, धने या पिकांबरोबरच एरंडी + धने, एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल..लागवडीचे नियोजन, व्यवस्थापनसुरुवातीस पाऊस न झाल्यास घाबरून न जाता पेरणीयोग्य पाऊस होण्याची (७५ ते १०० मिलिमीटर वाट पाहावी. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार पिकाची पेरणी करावी. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी..Crop Advisory: कृषी सल्ला : राहूरी विभाग.कापसाची पेरणी खोल व मध्यम खोल काळ्या जमिनीतच करावी. हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये.कपाशी + तूर (१०:२ किंवा ६:१) आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल.सोयाबीन + तूर (४:२) या आंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा.सोयाबीन पेरणीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा.तूर पिकांची लागवड शिफारशीप्रमाणे वाणांची निवड करून व योग्य अंतरावर करावी.मध्यम ते भारी जमिनीत कपाशीची सोबतच तूर, खरीप ज्वारी आणि सोयाबीन सारखी पिके घ्यावीत..हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीसाठी दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा.मध्यम जमिनीत सूर्यफुल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारीसारखी पिके घ्यावीत.हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळ, एरंडी सारखी पिके घ्यावीत.कपाशीमध्ये तूर (६:१ किंवा १०:२), सोयाबीन (१:१), मूग (१:१) किंवा उडीद (१:१) याप्रमाणे आंतरपीक घ्यावीत.भारी जमीन एक ते दोन सिंचन असल्यास तुरीच्या बीएसएमआर ७३६, गोदावरी, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७१६ या वाणांची निवड करावी. बीडीएन ७११ हे वाण कमी कालावधीचे वाण असून त्यांचा वापर कोरडवाहू क्षेत्रासाठी करावा..जमिनीची मशागत व पेरणी उताराला आडवी करावी जेणेकरून पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरेल व त्याचा पिकांना लाभ होईल.प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीनसाठी घरचे बियाणे वापरु शकतो. पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून तयार होणारे बियाणे दोन ते तीन वर्षे पेरणीसाठी वापरता येते. परंतु यासाठी घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी (कमीत कमी ७० टक्के असावी) पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया करताना थायरम २.५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम २ ग्रॅम त्यानंतर स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम, रायझोबियम जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम, ट्रायकोडर्मा ६ ते १० ग्रॅम प्रति किलो हे प्रमाण ठेवावे..पेरणी करताना योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरणी करावी (उदा. सोयाबीनची पेरणी ५ ते ६ सेंमीपेक्षा जास्त खोलीवर करू नये) हेक्टरी योग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे. हेक्टरी योग्य रोपांची संख्या ठेवावी.वेळेवर आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे जेणेकरून अन्नद्रव्ये, जमिनीतील ओलावा, जागा, सूर्यप्रकाश यासाठी पिकांना तणाकडून स्पर्धा होणार नाही तसेच कीड व रोगांना तणामुळे आश्रय मिळणार नाही..रासायनिक खतांच्या शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी किंवा ५० ते ७५ टक्के रासायनिक खतासोबत २५ ते ५० टक्के सेंद्रिय खताचा वापर करावा.एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा. यामुळे खर्चात बचत होईल. रासायनिक कीटकनाशकांच्या संतुलीत वापरामुळे कीड व रोगांची प्रतिकार क्षमता वाढणार नाही. उदा. सापळा पिके, जैविक किटकनाशके, आंतर पीक पद्धती, पक्षिथांबे, विविध प्रकारचे सापळे इत्यादी..शेताच्या सभोवताली बांध, शेतजमिनीत पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, मृद व जलसंधारणाचे सर्व उपाय, बांध बंदिस्ती, पूर्व मशागत, ठरावीक अंतरावर चर घेणे, चारही बाजूने झाडी, रुंद वरंबा पेरणीची पद्धत, अधिक रुंद वरंबा व खोल सरी (३ मी वरंबा, १ मी. सरी, ४५ सेंमी खोली), योग्य पिके व वाणांची निवड, योग्य पीक व्यवस्थापनाचा अवलंब (पेरणीसाठीची पद्धत, अन्नद्रव्य व्यवस्थाप, निचरा प्रणाली इत्यादी.) करावा.- डॉ. आनंद गोरे ९५८८६४८२४२(अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.