Climate Resilient Farming: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान’ प्रात्यक्षिक अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तंत्रज्ञानाविषयीच्या प्रात्यक्षिकांमध्ये सुमारे २६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तर सुमारे २६६८ हेक्टरवर बीबीएफ (रुंद वरंबा) पद्धतीने बेड तयार झाल्याची माहिती प्रकल्पाच्या जिल्हा व्यवस्थापनाकडून देण्यात आली..हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शेती शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ अंतर्गत खरीप २०२६ करिता विशेष ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील २९५ प्रकल्प गावांमध्ये एकूण १६ विविध हवामान अनुकूल तंत्रज्ञानांची शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे..BBF Sowing: यांत्रिकीकरण योजनेत बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अर्ज करा.अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्यक्ष कामाला २० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात २० ते ३० एप्रिल या कालावधीत ‘रुंद वरंबे (बेड) तयार करणे’ आणि ‘बेडवर टोकण पद्धतीने लागवड करणे’ यावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच शून्य मशागत व आंतरपीक पद्धतीबाबत जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४२३ प्रात्यक्षिक इव्हेंट घेण्यात आले. यासाठी २५ हजार ३६ शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार २७९ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील प्रकल्प गावांमध्ये आतापर्यंत २६६८ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रुंद वरंबा पद्धतीने बेड तयार केले आहेत. मे महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत हे क्षेत्र १० हजार एकरांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे..BBF Farming Technique: रुंद वरंबा सरी : लागवडीचे फायदेशीर तंत्र.अभियानात बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यात एकूण ४७० इव्हेंटचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ४०७ प्रात्यक्षिके पूर्ण झाली असून, ५६ इव्हेंट सध्या सुरू आहेत, तर ५ नियोजित आहेत. यासाठी २४ हजार १२ शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार ५७९ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून बीजप्रक्रियेचे महत्त्व आणि पद्धत समजून घेतली. हे अभियान यशस्वितेसाठी कृषी ताई, समूह सहायक आणि सहायक कृषी अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना एकत्रित केले जात आहे. .शेतकऱ्यांना स्वतःच्या हाताने प्रात्यक्षिक करण्याची संधी दिली जात आहे. ११ ते १६ मे दरम्यान लिंबोळ्या गोळा करणे, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क तयार करणे प्रशिक्षण दिले. तर १८ ते २३ मे दरम्यान जीवामृत व बीजामृत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे..शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आणि हवामान बदलाचे धोके टाळण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी, महिला बचत गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढील सर्व प्रात्यक्षिकांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.- विशाल साळवे, नोडल अधिकारी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.