डॉ. मधुकर मोरे, डॉ. आनंद गोरेबदलत्या हवामानामुळे कमी पाऊस, अतिवृष्टी किंवा कमी कालावधीत होणारा मुसळधार पाऊस अशी अनिश्चितता दिसून येते. त्याचा थेट परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होतो. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये पाणी साचणे, तर कमी पावसात ओलाव्याची कमतरता ही मोठी समस्या ठरते. .अशा परिस्थितीत पावसाच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर आणि अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यासाठी रुंद वरंबा-सरी (बीबीएफ) लागवड पद्धत प्रभावी ठरते. या पद्धतीमुळे जास्त पाऊस पडला तर अतिरिक्त पाणी रुंद वरंब्यातून सरीद्वारे शेतातून बाहेर निघून जाते. योग्य किंवा कमी प्रमाणात पाऊस पडला तर वरंब्यात पाणी मुरून पिकाला योग्य प्रमाणात उपलब्ध होते..BBF Sowing: यांत्रिकीकरण योजनेत बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अर्ज करा.बीबीएफ पद्धतीची गरज का?काही वेळा कमी तर कधी कमी वेळात जास्त पाऊस होऊन पिकांचे नुकसान होते.कमी पावसामुळे जमिनीत ओलावा कमी होऊन भेगा पडतात.कमी वेळात जास्त पाऊस झाल्यास पाणी साचून पिकांचे नुकसान होते.एकाचवेळी रुंद वरंबे व सरी पाडून पेरणी व खते देण्यासाठी.मध्यम ते भारी जमिनीत पाण्याचा निचरा व पाणी मुरण्यासाठी योग्य उपायांची गरज.पिकांच्या गरजेनुसार ६० ते १५० सेंमी रुंदीचे वरंबे करणे शक्य.जास्त अंतरावरील पिकांसाठी वरंब्यावर दोन ओळी, तर कमी अंतरासाठी चार ओळींवर लागवड शक्य..BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र.सोयाबीनसाठी वापरया पद्धतीत रुंद वरंब्यावर सोयाबीनची पेरणी केली जाते. दोन्ही बाजूंना सऱ्या तयार केल्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते.यंत्रामध्ये सरी पाडण्यासाठी दोन्ही बाजूंना दोन रिजर असतात. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार योग्य त्या आकाराच्या व खोलीच्या सऱ्या पाडणे शक्य.दोन सऱ्यांमध्ये रुंद वरंबा तयार होऊन त्यावर टोकण यंत्राने पेरणी करता येते.सोयाबीन पेरणी रुंद वरंबा सरीमध्ये साधारणत: ३ ते ५ सेंमी खोलीवर करावी..यंत्रामध्ये बियाणे आणि खतासाठी स्वतंत्र पेट्या, बीजमापन यंत्रणा, फणी, चकरी, बी-खत नळ्या आणि मजबूत फ्रेम असते.सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचे (नांगराचे) फाळ १५० सेंमी अंतरावर ठेवून यंत्र चालवावे. यामध्ये १२० सेंमी अंतराचा रुंद वरंबा तयार होऊन त्यावर ३० सेंमी अंतरावर सोयाबीनच्या ४ ओळी घेता येतात..ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचे फायदेपडलेल्या पावसाच्या पाण्याचा योग्य वापर होतो.सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साठून हळूहळू जमिनीत मुरते. त्यामुळे पावसात खंड पडला तरी जास्त काळ ओलावा टिकून राहतो.अतिवृष्टीतही पिकांचे संरक्षण होते. पावसाचे अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून बाहेर जाते. शेतात पाणी साचून राहत नाही. त्यामुळे मूळकुज होण्याचा धोका कमी होतो.एकाचवेळी वरंबे करणे, पेरणी आणि खते देणे ही कामे केली जातात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकाची वाढ चांगली होते..बियाणे योग्य प्रमाणात आणि समान अंतरावर पडते.योग्य खोली आणि अंतरावर पेरणी केल्यामुळे एकसारखी उगवण होऊन अपेक्षित रोपसंख्या राखणे शक्य होते.मजुरी, वेळ आणि इंधनाची बचत होते.आंतरमशागतीची कामे सोपी होतात.- डॉ. मधुकर मोरे ८७८८३७६९६५ (वरिष्ठ शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.