Banana Crop Insurance : निधीअभावी केळी विमा परताव्यांना विलंब होण्याची शक्यता

Crop Insurance Compensation : २०२३-२४ या हंगामात फळ पीकविमा योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार केळी उत्पादकांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे.
Banana crop insurance
Banana crop insuranceAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : राज्य शासनाचे अनुदान प्राप्त न झाल्याने हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ मध्ये केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या विमाधारकांना विमा परतावे किंवा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होईल, अशी स्थिती आहे. हे अनुदान शासनाने तत्काळ देऊन शेतकऱ्यांना परतावे वितरणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.

२०२३-२४ या हंगामात फळ पीकविमा योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार केळी उत्पादकांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे. या योजनेतून १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी केळी पिकास विमा संरक्षण देण्यात आले. हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत पात्र केळी विमाधारकांना विमा परतावे किंवा नुकसान भरपाई देय असल्याचा नियम आहे.

Banana crop insurance
Banana Crop Insurance : विमा प्रस्ताव फेटाळल्याने केळी उत्पादकांत संताप

हा विमा संरक्षण कालावधी संपून आता ३० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु परताव्यांबाबत शासनाकडून हालचाली दिसत नसल्याची स्थिती आहे. राज्य शासन या योजनेतून केळी पिकासाठी हेक्टरी २७ हजार ५०० रुपयांचा निधी विमा परतावा म्हणून देते.

तर १७ हजार रुपयांचा निधी केंद्र सरकार या योजनेत केळी पिकासाठी विमा परताव्यापोटी देते. राज्याकडून विमा परताव्यांपोटीचा निधी मात्र विमा कंपनीकडे जमा झालेला नाही. राज्याचा निधी आल्यानंतर केंद्र सरकार आपला निधी देते. परंतु राज्याकडूनच हा निधी न आल्याने विमा कंपनी हे परतावे शेतकऱ्यांना देण्यास बाध्य नाही.

Banana crop insurance
Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेतील कर्जदार शेतकऱ्यांचा टक्का वाढेना

निधी आल्यानंतर २१ दिवसांचा संकेत

राज्य शासनाचा निधी या योजनेसाठी प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी २१ दिवसांत परतावे पात्र केळी विमाधारकांच्या बँक खात्यात वर्ग करील, असाही संकेत या योजनेत आहे. यामुळे शासन केळी विमाधारकांना परताव्यांसाठी निधी देण्यास जेवढा विलंब करील, तेवढाच पुढे अधिकचा कालावधी परताव्यांना लागेल. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

यातच या योजनेबाबत २०२२-२३ मध्ये मोठा घोळ झाला. यामुळे परताव्यांबाबत आतापर्यंत तक्रारी, नाराजी, चौकशी असा प्रकार सुरू आहे. असा प्रकार यंदा न करता शेतकऱ्यांना वेळेत परतावे दिले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

विमा परतावे वेळेत केळी विमाधारकांना मिळत नाही. पुढे निवडणुका व अन्य धामधुमीत केळी उत्पादक, केळी विमाधारकांना वाऱ्यावर सोडू नये. पुढील काही दिवसांत हे परतावे केळी विमाधारकांना दिले जावेत. २०२२-२३ मध्ये जसा घोळ व विलंब झाला, तसा आता टाळावा, अशी अपेक्षा आहे.
- रोहित पाटील, केळी विमाधारक, कठोरा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com