Crop Insurance Scheme Reforms : जुन्या पीकविमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम

Weather Based Fruit Crop Insurance : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकासंबंधी परतावा मानके किंवा निकष (ट्रीगर) मागील हंगामापूर्वी लागू केले आहेत.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकासंबंधी परतावा मानके किंवा निकष (ट्रीगर) मागील हंगामापूर्वी लागू केले आहेत. जुने निकष लागू केलेले असले तरी काही उणीवा, त्रुटी या योजनेत ठेवल्या आहेत. पुढे त्या अडचणी, योजनेतील उणिवा दूर करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पीकविमा योजना केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे राबवित आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने याबाबतचा आदेश मध्यंतरी जारी केला होता. या आदेशामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असा दावा केला जात आहे.

Fruit Crop Insurance
Crop Insurance: सातारा जिल्ह्यात पीकविमा योजनेला कमी प्रतिसाद

अनेक केळी उत्पादक वंचित राहतात

केळी पिकासाठी फक्त एकच हंगामात विमा संरक्षण घेता येते. त्यात रब्बी हंगामाअंतर्गत आंबिया बहरसाठी १ ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान फळ पीकविमा योजनेत सहभाग घेता येतो. यात ज्या शेतकऱ्यांना ऑक्टोबरनंतर केळीची लागवड करायची आहे, ते शेतकरी विमा योजनेत सहभाग घेऊ शकत नाहीत.

कारण योजनेत सहभागी होताना सात-बारा उताऱ्यावर ई-पीकपाहणीअंतर्गत केळी लागवड नोंद व केळीची लागवडसंबंधी जिओ टॅगिंगचे छायाचित्र आवश्यक आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ३१ ऑक्टोबरपर्यंत केळी पीक उत्पादनक्षम स्थितीत असते, तेच शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकत आहेत.

जिल्ह्यात दर महिन्याला केळीची लागवड होत असते. यामुळे पुढील काळात या योजनेतून उन्हाळ्यातही विमा संरक्षण घेण्यासंबंधीची तरतूद करावी, नियमांत शिथिलता आणावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Fruit Crop Insurance
PM Crop Insurance: विमा परताव्यासाठी केंद्राचा सोमवारी देशव्यापी कार्यक्रम

अनेक केळी उत्पादक शेतकरी आहेत. १० ते १२ हेक्टर जमीनधारणा असलेले केळी उत्पादक असताना या योजनेत एक खातेदार शेतकरी फक्त कमाल चार हेक्टर केळीखालील क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेऊ शकतो. हा निकष किंवा मानक बदलण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.\

...या आहेत त्रुटी.

केळी पिकासंबंधी करपा, कुकुंभर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) या समस्यांसाठी विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. तसेच वादळासंबंधीदेखील १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीसाठी विमा संरक्षण आहे. पण खानदेशात केळीला बारमाही वादळाचा फटका बसतो. यामुळे वादळासंबंधीचे विमा संरक्षण एक वर्षासाठी किंवा किमान ११ महिन्यांसाठी असावे, अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com