Jagdeep Dhankhar : शेतीमाल दराच्या मुद्यावरून देशातील शेतकरी असहाय का?

Agricultural Commodity Price Issues : देशाच्या पंतप्रधानांचा जगातील अग्रक्रमी नेत्यांमध्ये समावेश होत असताना त्याच वेळी शेतीमाल दराच्या मुद्यावरून देशातील शेतकरी असहाय का वाटतो आहे? गेल्या वर्षी आंदोलन केल्यानंतर त्यांना याच मुद्यावर पुन्हा आंदोलन का करावे लागत आहे.
Jagdeep Dhankhar
Jagdeep DhankharAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : देशाच्या पंतप्रधानांचा जगातील अग्रक्रमी नेत्यांमध्ये समावेश होत असताना त्याच वेळी शेतीमाल दराच्या मुद्यावरून देशातील शेतकरी असहाय का वाटतो आहे? गेल्या वर्षी आंदोलन केल्यानंतर त्यांना याच मुद्यावर पुन्हा आंदोलन का करावे लागत आहे, असा परखड सवाल उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांना विचारला.

मुंबईतील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेच्या (सिरकॉट) शताब्दी सोहळ्यात मंगळवारी (ता. ३) धनखड बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही भारताला बदलताना पाहिले. विकसित भारताचे स्वप्न साकार होत असल्याची अनुभूती आम्ही आज घेत आहोत. संवादातूनच तोडगा निघू शकतो, असा संदेशही भारताच्या पंतप्रधानांनी जगाला दिला आहे.

Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar : 'शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं का पाळली जात नाहीत?', उपराष्ट्रपती धनखड यांचा केंद्रीय कृषीमंत्र्यासह केंद्राला सवाल

त्यामुळेच जगातील शीर्ष नेत्यांमध्ये श्री. मोदी यांचा समावेश होतो ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु केंद्रीय कृषिमंत्रीजी तुमचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तरीसुद्धा भारतीय राजघटनेत दुसऱ्या क्रमांकावर असणारी व्यक्‍ती तुम्हाला विनंती करीत आहे, कृपया मला सांगा, की शेतकऱ्यांना काही वचन देण्यात आले होते का?

Jagdeep Dhankhar
Agricultural Research : मूलभूत संशोधनाकडून अन्न सुरक्षेकडे...

दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आपण काय करत आहोत? उत्पादकता खर्चाच्या प्रमाणात शेतीमालाला भाव मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकरी असहाय का वाटत आहे? गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांचे आंदोलन झाले आणि या वर्षी देखील होत आहे. काळाचे चक्र फिरत असताना आम्ही काहीच करत नाही. विकसित राष्ट्राचा दर्जा मिळविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे उत्पन्न आठपटींनी वाढवावे लागेल. त्यातील बहुतांश भाग ग्रामीण असणार आहे. त्यांना केंद्रित ठेवूनच वाटचाल करावी लागेल.’’

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महाव्यवस्थापक डॉ. हिमांशू पाठक, डॉ. शाम नारायण झा, डॉ. के. नरसैय्या, सिरकॉट संचालक डॉ. एस. के. शुक्‍ला, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, गोविंद वैराळे, डॉ. सी. डी. मायी, पंदेकृविचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

शेतकरी हितालाच प्राधान्य : कृषिमंत्री

‘‘केंद्र सरकारने शेतकरी हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. भारत शेतकऱ्यांशिवाय समृद्ध होऊ शकत नाही. आजही शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी त्याचा आत्मा आहे,’’ असे मत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या वेळी व्यक्‍त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com