Ujani Dam : उजनीतून धरणातून शेतीसाठी दुसरे आवर्तन देण्यासाठी मंजूरी; ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा

Ujani Dam Solapur : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ४ जानेवारीपासून सोडलेले पाणी आता ८ ते ९ फेब्रुवारीपर्यंत बंद केले जाणार आहे.
Ujani Dam
Ujani Damagrowon
Published on
Updated on

Ujani Dam Farmers : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ४ जानेवारीपासून सोडलेले पाणी आता ८ ते ९ फेब्रुवारीपर्यंत बंद केले जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्चअखेर दुसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आर्वतन सोडले जाणार आहे. नियोजन भवन समितीच्या सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे खांडेकर म्हणाले, "उजनी धरणात २९ जानेवारी २०२५ रोजी उपयुक्त पाणीसाठा ४०. ५९ टीएमसी असून अचल पाणीसाठा ६३.६६ टीएमसी आहे. तर एकूण पाणीसाठा १०४.२५ टीएमसी इतका असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत ६ टीएमसी पाणी आवर्तन यापूर्वी सोडलेले आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी पिण्याच्या पाण्याचे २ आकस्मिक आरक्षण देणे शक्य आहे." अशी माहिती खांडेकर यांनी दिली.

Ujani Dam
Solapur Doodh Sangh : सोलापूर जिल्हा दूध संघप्रकरणी आता ५ फेब्रुवारीला सुनावणी

"सोलापूर शहर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत ५.५० टीएमसीचे दुसरे आवर्तन तर ६.५० टीएमसीचे तिसरे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज मंजुरी दिली. दरम्यान, हेच पाणी पुढे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज-चिंचपूर बंधाऱ्यात येईल. फेब्रुवारीअखेर सुटणारे पाणी सोलापूर शहरासाठीचे दुसरे आवर्तन असणार आहे. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात आणखी एकदा सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल". अशीही माहिती खांडेकर यांनी दिली.

"सोलापूर शहर व भीमा नदी काठावरील इतर पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडणे आवश्यक होते. परंतु पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीची बैठक घेता आली नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री यांची मान्यता घेऊन भीमा नदीचे पहिले आवर्तन पूर्ण केल्याची माहिती खांडेकर यांनी दिली. पुढील नियोजित वेळेनुसार आज समितीने दिलेल्या मान्यतेप्रमाणे दुसरे व तिसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे". असे खांडेकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com