
१) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची नवीन नोंदणी सप्टेंबर 2025 पासून बंद करण्यात आली आहे.
२) ८०,000 अर्ज अपात्र ठरवत रद्द केले, बोगस अर्ज व अटींचा भंग कारणीभूत.
३) कठोर निकषांमुळे अनेक पात्र महिलाही वंचित राहिल्या आहेत.
४) १५०० रुपयांचा जुलै हप्ता अनेकांच्या खात्यात जमा झाला नाही.
५) महिलांमध्ये सरकारविरोधात नाराजी वाढली असून पारदर्शकतेची मागणी केली जात आहे.
Pune News: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच सरकारने नव्या लाभार्थ्यांसाठी अर्ज नोंदणी सप्टेंबर २०२५ पासून थांबवली आहे. तब्बल ८० हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरवून रद्द करण्यात आले असून, बनावट अर्ज व अटींचा भंग केल्याच्या कारणांमुळे जुलै महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला नाही.
वार्षिक उत्पन्नाची मर्यादा, आयकर भरणाऱ्यांचे अर्ज, शेतजमीन व चारचाकी मालकी यांसारख्या कठोर निकषांमुळे हजारो पात्र महिलाही योजनेपासून वंचित झाल्याने यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.‘लाडकी बहीण’ योजनेला सुरुवातीपासूनच मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना लाभदायक ठरली, परंतु काही बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले.
यानंतर सरकारने बनावट अर्ज शोधण्यासाठी विशेष तपास मोहीम सुरू केली. या तपासादरम्यान अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या, तर काही महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले. शासनाच्या कठोर पडताळणीनंतर हजारो अर्ज रद्द करण्यात आले, ज्यामुळे जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला नाही.
सरकारने अर्ज रद्द करण्यासाठी काही कठोर निकष ठेवले आहेत. खालीलप्रमाणे परिस्थितींमध्ये अर्ज अपात्र ठरत आहेत:
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास.
कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा असल्यास.
कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी असल्यास.
इतर कोणत्याही योजनेतून १५०० रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळत असल्यास.
कुटुंबाच्या नावावर पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन किंवा चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत असल्यास.
अर्ज रद्द झाल्याने आणि नवीन नोंदणी बंद झाल्याने अनेक पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे सरकारविरोधात नाराजी वाढत आहे. अनेक महिलांनी प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, पारदर्शकता आणि योग्य संवादाची मागणी केली आहे.
१) ‘लाडकी बहीण’ योजनेची नोंदणी का बंद केली गेली आहे?
बोगस अर्जांची संख्या वाढल्याने आणि अपात्र लाभार्थ्यांचा तपास करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला.
२) माझा अर्ज रद्द का झाला असावा?
उत्पन्न मर्यादा, आयकर भरण्यास पात्र, जमीन किंवा वाहन मालकी यामुळे अर्ज अपात्र ठरतो.
३) जुलै महिन्याचा हप्ता का मिळाला नाही?
अर्ज तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यामुळे किंवा अपात्र ठरल्यानं हप्ता रोखण्यात आला.
४) नवीन नोंदणी पुन्हा कधी सुरू होईल?
सध्या निश्चित तारीख नाही; सरकारकडून पुढील सूचना अपेक्षित आहेत.
५) अपात्र ठरल्यावर काही उपाय आहेत का?
पात्रता सिद्ध करणारे कागदपत्रे सादर करून फेरविचारासाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधता येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.