
Kolhapur News: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर सुरू आहेत. त्यामध्ये आता शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांचाही समावेश झाला आहे. या ‘एआय’ तंत्रज्ञानाबाबतच्या ए.आय. बेस्ड डिव्हाइस फॉर डिटेक्शन ऑफ प्लांट डिसिजेस’ उपकरणास पेटंट मिळाले आहे. पाच संशोधकांच्या या उपकरणास भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे.
शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भय्यासाहेब राजमाने महाविद्यालय, म्हसवड येथील डॉ. सुजित जाधव, कृष्णा महाविद्यालय, रेठरे येथील डॉ. सुनीता जाधव, विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे सहायक ग्रंथपाल,
लंडनच्या क्वीन्स मेरी युनिव्हर्सिटीत एम.एस.चे (ए.आय.) शिक्षण घेत असलेले ऋतुराज जाधव आणि राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर येथे बी.ई.चे (इलेक्ट्रिकल) शिक्षण घेत असलेले पृथ्वीराज जाधव यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे. त्यांच्या ‘ए.आय. बेस्ड डिव्हाईस फॉर डिटेक्शन ऑफ प्लांट डिसिजेस’ या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट जाहीर करण्यात आले आहे.
या संदर्भात डॉ. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध पिकांवर सापडणारे आणि हवेतून संक्रमण करू शकणारे वेगवेगळ्या रोगांचे विषाणू शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी टिळक एअर सॅम्पलर वापरला जातो. हे सॅम्पलर शेतात ठेवून सॅम्पल गोळा केले जातात आणि नंतर प्रयोगशाळेमध्ये आणून तज्ज्ञांच्या मदतीने ओळखले जातात, अशी आजपर्यंतची प्रक्रिया आहे.
तथापि, या नवीन संशोधनानुसार टिळक सॅम्पलरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्येच पिकांवर कोणत्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, हे ओळखता येणार असून त्यानुसार त्वरित उपाययोजना करता येणार आहेत. या संशोधनाचे डिझाइन पेटंटवरील संशोधकांना मिळाले असून, पुढील काळात त्यावर उपयुक्तता पेटंट मिळविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य, डॉ. संजय दीक्षित यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
चारशे रुपये दर करण्याची मागणी
विद्यमान स्थितीत महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांना २९७ रुपये दर दिला जातो. मजुरीचे दर केंद्र सरकारद्वारे निश्चित केले जातात. दर वर्षी एक एप्रिलला ते जाहीर करण्यात येतात. यंदा हे दर चारशे रुपये करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.