Jalgaon News : खानदेशात शेतीकामांना मजूरटंचाईचा फटका बसत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी शेत तापू दिले किंवा दोन-तीन महिन्यांपूर्वी क्षेत्र रिकामे केले होते, त्या शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीस वेग दिला आहे.
लहान, अल्पभूधारक शेतकरी पुढे पीक लागवडीचे नियोजन करीत आहेत. खानदेशात कापसाची लागवड अधिक असते. यामुळे कापूस लागवडीची तयारीदेखील कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी गावोगावी करीत आहेत. शेतीच्या मशागतीसाठी पूर्वी बैलजोडीचा उपयोग अधिकचा करायचे. परंतु अलीकडे ट्रॅक्टर व अन्य यंत्रणा आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने शेतकरी मशागत करून घेत आहेत.
अनेकांनी महिनाभरापूर्वी खोल नांगरणी करून शेत तापू दिले. त्यात आता रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत केले जात आहे. शेत भुसभुशीत करून त्यात केळी, कापूस लागवडीचे नियोजन कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यात केळी, कापूस व अन्य भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अनेक जण गादीवाफे तयार करून घेत आहेत. नंदुरबारात केळी, मिरची, कारली, टोमॅटो व अन्य पिकेही असतात. या पिकांच्या लागवडीची तयारी या भागात झाली आहे.
जूनमध्ये लागवडीचे नियोजन
खानदेशात कापूस, केळी, मिरची आगाप लागवड केली जात होती. परंतु उष्णता आता अधिक आहे. त्यात पुढे आणखी वाढीचे संकेतही आहेत. यामुळे शेतकरी सध्या शेत लागवडीसाठी तयार करून घेत आहेत. अनेकांनी गादीवाफ्यांवर मिरची व अन्य पिकांसाठी पॉली मल्चिंगदेखील टाकून घेतले आहे. १ जून किंवा ५ जूनपर्यंत त्यात लागवड केली जाईल. कापसाची लागवडदेखील अनेक जण १ जूननंतर करतील, असे दिसत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.