
Akola News : कृषी विभागाचा प्रत्यक्ष बांधावर काम करणारा कृषी सहायक हा महत्त्वाचा घटक आहे. हे कर्मचारीच गेल्या तीन दिवसांपासून संपावर असल्याने त्याचे परिणाम दिसून येत आहेत. कृषी खात्याची गावपातळीवरील कामे पूर्णतः थांबली आहेत.
खरिपाची तयारीही खोळंबल्याचे जिल्हा कृषी खात्यातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कृषी सहायकांच्या कामबंद आंदोलनाचा कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. या संपामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांची अंमलबजावणी, बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी अशा विविध कामांवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.
कृषी सहायक हे गाव पातळीवर सरकार आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचे दुवा म्हणून काम करतात. त्यांच्या अनुपस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणे कठीण होत आहे. शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नसल्यामुळे हा संप किती दिवस चालेल याबाबत अनिश्चितता आहे.
दरम्यान, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कृषी सहायकांनी आता गुरुवारपासून (ता. १५) पूर्णपणे कामबंद आंदोलन छेडले आहे.
आंदोलनामुळे प्रामुख्याने योजनांची अंमलबजावणी मंदावली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. शासनाने त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करून तातडीने तोडगा काढावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.