
Chh. Sambhajinagar News : येथून पुढील दोन महिने फळबागेसाठी फार महत्त्वाची आहेत. वाढते तापमान हे आपल्या सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. अशा वेळी डाळिंब, मोसंबी आदी बागेत गवताचे आच्छादन टाकणे गरजेचे वाटते. यामुळे दिलेल्या पाण्यामुळे ओल जास्त दिवस टिकण्यास मदत होईल असे मत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमात डॉ. सूर्यकांत पवार यांनी बुधवारी (ता.९) हिवरा गावातील विविध शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत त्यांना मार्गदर्शन केले. प्रथम कल्याणराव पोफळे यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. यावेळी सुदर्शन पोफळे, हनुमान पोफळे, भरत आहेर, अप्पासाहेब आहेर, बबन कनाके, बळिराम आहेर, तुकाराम रोपवाटिकेचा विठ्ठल पोफळे आदी शेतकरी उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, की या भागात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्ष २००५ ते २०१० या काळात ग्रामीण जैव संसाधन प्रकल्प राबविला. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विशेषतः डाळिंब या फळपिकांची लागवड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी लाभली.
रामेश्वर ठोंबरे म्हणाले, की या भागातील तरुण शेतकरी उत्तम पद्धतीने शेती करतात. आपसात चर्चा करून पीक नियोजन करतात. त्यामुळे गट शेतीची संकल्पना या गावात दिसते. डाळिंब शेतीकडून काही शेतकरी आता द्राक्ष शेतीकडे वळत आहे.
भाजीपाला शेती या भागातील एक प्रमुख शेती पद्धत म्हणून पुढे येत आहे. यावेळी हनुमान पोफळे यांनी दोन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या केशर आंबा बागेची पाहणी केली. या वेळी डॉ पवार यांनी शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.