
Nanded News : नांदेड जिल्ह्यात यावर्षी झालेला मुबलक पाऊस, जलसाठ्यांमधील विपूल प्रमाणातील सिंचनाचे पाणी व पाऊसासोबतच योग्य प्रमाणातील थंडीचे वातावरण यामुळे रब्बीसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक वातावरण आहे.
त्यामुळे हा रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना चांगला जाईल यासाठी सर्व पूरक उपाययोजना करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. विधानसभा व नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक संपताच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गेली दोन दिवस जिल्ह्यातील विविध गावांचा दौरा करून रब्बी हंगामाच्या पीक परिस्थितीची पाहणी केली.
जिल्ह्यात सध्या रब्बी पेरणी अंतिम टप्यात आहे. रब्बी ज्वारी, हरभरा पेरणीची कामे आटोपली आहेत. तर प्रकल्पातील पाणी पाळ्यांचे नियोजन होत असल्याने आगामी काळात बागायती गहू पेरणी होणार आहे.
या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना उत्तमपूरक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी (ता. २६) इलिचपूर येथील प्रशांत दुर्गादास तीर्थे यांच्या शेतावर दौऱ्यादरम्यान भेट दिली.
या वेळी त्यांनी हरभरा, ज्वारी व हळद पिकांची पाहणी केली. हरभरा पिकांमध्ये जास्तीत जास्त जैविक कीड नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, मंडळ कृषी अधिकारी सुनील सानप, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण चिंचेवाड, कृषी सहायक श्रीमती शिंदे उपस्थित होत्या. नांदेड तालुक्यामध्ये या वेळी हरभरा, ज्वारी व गहू पिकाखाली शेकडो हेक्टर जमीन आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या सूचना वरचेवर करण्याचे त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.