
Amaravati News : कृषी क्षेत्रात मजुरांच्या उपलब्धतेची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. त्याची दखल घेत कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळावे याकरिता कृषी अवजारांवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी प्रयोगशील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सिमारामन यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे देखील विभाजन होत आहे. जमीनधारणा कमी झाली असल्याने अशा क्षेत्रात उत्पादकता खर्च कमी झाला तरच ती फायद्याची होईल.
सध्या शेतीसह इतर सर्वच क्षेत्रात मजुरांच्या उपलब्धतेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी शेतीसह सर्वच क्षेत्रांत यंत्रांचा वापर वाढीस लागला आहे. त्याला आणखी प्रोत्साहन मिळणे अपेक्षित असताना सरकारने त्यावर जीएसटी आकारण्यावर भर दिला आहे.
यातून शेती क्षेत्रासमोरील आव्हान आणखी गंभीर होणार असल्याने येत्या काही वर्षात शेती करण्यासाठी देखील कोणी इच्छूक राहणार नाही. याची गांभीर्याने दखल घेत कृषी निविष्ठांसह अवजारांवरील जीएसटी संदर्भात फेरविचार करावा, अशी मागणी देखील रवींद्र मेटकर यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.