
Vikramgad: तालुक्यातील भोपोली हद्दीतील घाणेघर गावातील नागरिकांचे पुलावाचून हाल होत आहेत. येथील ओहळावर पूल नसल्याने साकवावरून विद्यार्थ्यांसह नागरिकांना पावसाळ्यात प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून पूल मंजूर करण्यात अपयश आले आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गापासून आठ किमी अंतरावर मनोर-विक्रमगड मार्गावर असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत भोपोली-घाणेघर अंतर्गत येणाऱ्या घाणेघर गावाची लोकवस्ती सुमारे दोन हजार ३५० आहे. गावात जाण्यासाठी बोरांडा गावाजवळून सुमारे सहा ते सात किमी अंतराचा फेरफटका मारून जावे लागते.
या दगडाच्या मार्गाचा वापर करून नागरिक, विद्यार्थ्यांना जावे लागते, तसेच सरकारी कामाकरिता या लाकडी साकवाचा लोकांना आधार घेत पालघर, विक्रमगडमधील कार्यालय गाठावे लागते.
भोपोली आश्रमशाळा आणि के. जे. जोगानी हायस्कूलमधील जवळपास १५० विद्यार्थ्यांना जाण्यासाठी भोपोली गावामधून मार्गाने जावे लागते. हा मार्ग अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरचा आहे, मात्र हा दीड किमीचा अंतराचा रस्ता पावसाळ्यात अतिशय अवघड बनतो. येथील ओहळ ओलांडताना वृद्ध, रुग्णांची, तसेच विद्यार्थ्यांची दमछाक होते.
मुलीला जीवदान
मागील वर्षाच्या पुरात एक मुलगी वाहून जात असताना ग्रामस्थांनी सतर्कतेने मुलीला वाचवले. दरवर्षी अशा घटना घडत असतात. त्यामुळे किमान आता तरी पुलाला मंजुरी द्यावी, अशी मागणी सरपंच महेंद्र पाटील यांनी केली आहे. लवकरात लवकर पाहणी करून पुलाची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.