Amravati News : हमखास पावसाचा भाग अशी मेळघाट व चिखलदऱ्याची ओळख. सुमारे २००० मिलिमीटर पाऊस या भागात मॉन्सूनकाळात पडतो. मात्र त्यानंतरही पिकाच्या शाश्वत सिंचनाची सोय असावी याकरिता खटकाली गावचे रिंगा बुडा जांभेकर या शेतकऱ्याने तब्बल २३ लाख लिटर क्षमतेचे शेततळे खोदले आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम पूर्णत्वास आले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिवारात वैयक्तिकस्तरावर सिंचनाच्या सोयी निर्माण होत त्यातून उत्पादकता वाढीला प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रयत्न होत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्या अंतर्गंत मनरेगाच्या तांत्रिक अधिकारी आरती बछले यांनी मोथा गाव परिसरातील शेतकऱ्यांना अस्तरीकरण असलेल्या शेततळ्यांचे महत्त्व पटवून दिले. शेततळे फायदेशीर ठरणार असल्याचे लक्षात आल्यानंतर खटकाली गावच्या रिंगा बुडा जांभेकर यांनी आपल्या शेतात शेततळ्यास सहमती दर्शविली.
रिंगा जांभेकर हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांच्या शिवारात कॉफी, आंबा फळबागा आहेत. त्यासोबतच इतरही फळझाडे असून कृषी पर्यटनाचा उपक्रमही ते राबवितात. त्यांच्या पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्यांना ते आपल्याच शिवारात प्रक्रिया केलेली कॉफी देखील विकतात. मात्र उन्हाळ्यात पाण्याअभावी फळपिके जगविण्याचे आव्हान निर्माण होते. त्यामुळेच त्यांनी शेततळे खोदण्यासाठी पुढाकार घेतला.
२३ लाख लिटरची क्षमता
रिंगा जांभेकर यांच्या शेतात खोदण्यात आलेल्या शेततळ्याची पाणी साठवण क्षमता २३ लाख लिटर इतकी प्रचंड आहे. मेळघाटात २००० मिमि पाऊस बसतो. त्यामुळे ७५ टक्के शेततळे हे पावसाच्या पाण्याचे भरेल तर उर्वरित २५ टक्के शेततळे भरण्यासाठी इतर स्त्रोतांचा पर्याय वापरला जाणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.