Agriculture Sowing : पालघरमध्ये ९८ टक्के पेरण्या

Kharif Season : गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात तुरळक पाऊस आणि ऊन असे वातावरण आहे. तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९८ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Palghar News : गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात तुरळक पाऊस आणि ऊन असे वातावरण आहे. तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९८ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे भातलावणीची कामे वेगात सुरू झाली आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात धुळवाफेवर भाताच्या बियाणांच्या पेरण्या करण्यात आल्या होत्या. या शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यानंतर, भाताची रोपे जोमाने वर येऊन मोठी झाल्यानंतर, गेल्या तीन-चार दिवसांत भाताची लावणी सुरू केली. त्यामुळे पाऊस उशिरा झाला, तरी लवकर भाताच्या रोपांची लागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाचा चांगला फायदा मिळणार आहे.

Kharif Sowing
Agriculture Sowing : अकोल्यातील रखडलेल्या पेरण्यांना वेग

पालघर जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आटोपून घेतली होती, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची भातलावणी पावसाअभावी बाकी होती. रोपे तयार झाली होती, परंतु पाऊस नव्हता. अखेर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच गावपाड्यांमध्ये भातपिकाच्या लावणीला शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सुरुवात केली आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व शेतात पाणी साचल्याने भातलावणी करण्यास सुरुवात केली.

Kharif Sowing
Khandesh Sowing : खानदेशात ९१ टक्के पेरण्या पूर्ण

विविध भात बियाण्यांची मागणी

जया, सुवर्णा, कर्जत ७, कर्जत १३, कोलम, झिनी-वाडा कोलम, वाडा कोलम-संकरित, सुरती, गुजरात-११, गुजरात-४, रत्ना, कर्जत, मसुरी जातीच्या भात बियाण्याची पेरणी केली गेली आहे. पाऊस लांबला असला तरी समाधानकारक पाऊस पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचबरोबरीने खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्हा कृषी विभागाने खतांचे नियोजनही करून ठेवले आहे. जिल्ह्यात आजमितीस १२०० टन युरिया खत, तर एक हजार टन अन्य खते कृषी बाजारात उपलब्ध आहेत.

मजूर शोधताना हाल

जिल्ह्यात हळवे, गरवे, निमगरवे प्रकारांची भात लागवड केली जाते. खरीप हंगामात भातासह डोंगराळ भागात नागली, वरई व इतर कडधान्ये व पिकांचीही लागवड केली जाते. डोंगराळ भागासह किनारपट्टी क्षेत्रात अजूनही पारंपरिक पद्धतीची शेती केली जात आहे. स्थानिक पातळीवर एका शेतमजुराला दररोज ३०० ते ३५० रुपये मजुरी द्यावी लागते.

भाताला प्राधान्य

खरीप हंगामात पालघर जिल्ह्यात एक लाख चार हजार ९६२ हेक्टर क्षेत्रात भात, नागली, वरई, तूर, उडीद, भुईमूग आदी पिकांची लागवड केली जाते. सर्वाधिक क्षेत्रावर भात लागवड केली जाते; तर जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील डोंगरउतारावर नागली आणि वरईची पेरणी करण्यात येते. नाचणी लागवडीचे क्षेत्र एक हजार १३ हेक्टर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com