Water Crisis : मराठवाड्यातील ७७ लघु-मध्यम प्रकल्प पडले कोरडे

Water Storage in Marathwada Update : मराठवाड्यातील ७५० लघु प्रकल्पांपैकी ७४ तर ७५ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे पडले आहेत.
Water Dam
Water DamAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील ७५० लघु प्रकल्पांपैकी ७४ तर ७५ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे पडले आहेत. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तळ गाठणारे प्रकल्प मराठवाड्यातील जनतेची चिंता वाढवीत आहेत.

कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पांची संख्या धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक आहे. धाराशिव जिल्ह्यातील २०६ लघु प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प कोरडे पडले असून बीड जिल्ह्यातील १२६ पैकी १९, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ पैकी ९, लातूरमधील १३४ पैकी ९ लघु प्रकल्पांचा कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पात समावेश आहे.

दुसरीकडे ७५ पैकी कोरड्या पडलेल्या ३ मध्यम प्रकल्पात धाराशिव जालना व बीड मधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. जवळपास २४६ लघु प्रकल्प मधील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून त्यामध्ये सर्वाधिक ९३ लघु प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील आहेत.

त्या पाठोपाठ बीड मधील ५५ लातूर मधील ४६ छत्रपती संभाजीनगर मधील २७ जालना मधील दहा परभणीतील १३ व नांदेड मधील दोन लघु प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या २३ मध्यम प्रकल्पांमध्ये लातूर व जालन्यातील प्रत्येकी तीन बीड मधील सहा छत्रपती संभाजी नगर मधील दोन व नांदेड मधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

Water Dam
Water Storage : लातूरमध्ये १४४ प्रकल्पांत १४ टक्के साठा

माजलगाव प्रकल्पात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणी

मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी माजलगाव प्रकल्पात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय मांजरा व निम्न दुधना प्रकल्पातही प्रत्येकी १५ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. जायकवाडीत ३५ टक्के, येलदरीत ५१ टक्के, सिद्धेश्वरमध्ये ५७ टक्के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ६४ टक्के, निम्न तेरणामध्ये १० टक्के, निम्न मनारमध्ये ४३ टक्के, विष्णुपुरीत ५३ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

Water Dam
Water Storage : नांदेडमधील पाणीसाठा ५२ टक्क्यांपर्यंत खालावला

धाराशिवमधील मध्यम प्रकल्पात केवळ ७ टक्के उपयुक्त पाणी..

धाराशिव जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पात केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ जालनामधील सात व परभणीतील दोन मध्यम प्रकल्पात प्रत्येकी ९ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पात १५ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात २८ टक्के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पात १४ टक्के, तर नांदेड मधील ९ मध्यम प्रकल्पात ४२ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

पाणीसाठा ३२ टक्क्यावर

मराठवाड्यातील ८७७ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह तेरणा, मांजरा, रेना व गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ३२.८१ टक्क्यावर आला आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पातील ३९ टक्के पाणीसाठ्यासह , ७५ मध्यम प्रकल्पातील १८. ६५ टक्के, ७४९ लघु प्रकल्पातील १९.५५ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ४२.१४ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ३०.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com