Beed News : गतवर्षी गेवराई तालुक्यातील १३ महसूल मंडळांत अत्यल्प पाऊस झाल्याने ७५ गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत. तर, काही गावांतील नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवत आहेत.
मागील वर्षी पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिली. फेब्रुवारीपासून बहुतांश गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, गावांतील हातपंप कोरडे पडले. पर्यायाने नागरिक पाणी असलेल्या विहिरींचा शोध घेत पाण्यासाठी वणवण भटकंती करू लागले. परिणामी, काही ठिकाणच्या नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.
साधारण ७५ गावांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झालेल्या आहेत. पंचायत समिती कार्यालयात टॅंकर प्रस्ताव दाखल केले असताना आतापर्यंत फक्त ३४ गावांत टॅंकर सुरु केले असले तरी यात फक्त एक सरकारी तर ३८ खासगी असे एकूण ३९ टॅंकर ३४ गावांत सुरू झाल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. ३८ ग्रामपंचायतींनी टॅंकरकरिता प्रस्ताव मंजुरीस पाठविण्यात आले.
टॅंकरच्या प्रतीक्षेत असलेली गावे
महाडुंळा, चकलांबा, भंडगवाडी, शेकटा, खळेगाव, महारटाकळी, मुळुकवाडी, चोरपुरी, हिवरवाडी, धारवंटा, कुंभेजळगाव, भेंड टाकळी, राजपिंपरी, जातेगाव, पाचेगाव, मादळमोही, निपाणी जवळका.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.