Water Scarcity : एकदा पाणी आलं की चौदा दिवसांनीच नंबर

Water Shortage : पाणीबाणीची स्थिती गोळेगाव शिंगपूर (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील जावेद खान हुसेन पठाण यांनी कथन केली.
Water Issue
Water ScarcityAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : ‘‘पाण्याचे संकट किती भीषण आहे साहेब तुम्हाला सांगावं तेवढं कमी आहे. २५० ते ३०० उंबऱ्याचं आणि सुमारे २००० लोकसंख्येचं आमचं गाव. दिवसाला दोन टँकर पाणी मिळतं. पाणी मिळालं की पुन्हा गावाचा १३ ते १४ दिवसांनीच नंबर येतो. मग मिळेल तिथून शेंदून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. जनावरांचं तर लय हाल हायतं. सूर्य आग ओकतोय. त्यामुळं सकाळीच घरोघरी जमेल तेवढी सोय करण्याचे प्रयत्न सुरू असतात,’’ अशी पाणीबाणीची स्थिती गोळेगाव शिंगपूर (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील जावेद खान हुसेन पठाण यांनी कथन केली.

जसजशी उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे, तसतसे मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो आहे. त्यामुळे कोरड्या पडणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढली आहे. तब्बल ११२ लघु, मध्यम प्रकल्प पूर्णपणे आटले आहेत. ३०८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे तर दोन मोठे प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. या शिवाय आणखी तीन प्रकल्प जवळपास मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर आहेत.

Water Issue
Water Shortage : नगरला टॅंकरच्या संख्येत वाढ

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प कोरडे पडले आहेत. या चार प्रकल्पांत बीडमधील दोन तसेच जालना व धाराशिवमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. मध्यम प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ११ प्रकल्प धाराशिवमधील असून त्या पाठोपाठ बीडमधील ६, लातूर व जालन्यातील प्रत्येकी ३ तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणीमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे.

७५० लघु प्रकल्पांपैकी तब्बल १०८ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ५० प्रकल्प धाराशिवमधील असून त्या पाठोपाठ बीडमधील ३६, छत्रपती संभाजीनगरमधील १२ व लातूरमधील १० प्रकल्पांचा समावेश आहे. मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी धाराशिवमधील सीना कोळेगाव व बीड मधील माजलगाव आधीच मृतसाठ्यात गेले आहेत. दुसरीकडे धाराशिवमधीलच निम्न तेरणा, परभणीतील निम्न दुधना, बीड मधील मांजरा प्रकल्प मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर आहे.

जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांत तर उपयुक्त पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. म्हणजे ही सर्व प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. शिवाय परभणी, बीड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांतील लघु प्रकल्प झपाट्याने मृत साठ्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात मराठवाड्यावर मोठे पाणीसंकट येईल, अशी स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, सिल्लोड व कन्नड या तालुक्यांमध्ये अनुक्रमे पाणी टंचाईची स्थिती भीषण होत चालली आहे. सर्वाधिक ३८५ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. जिल्ह्यात २४० गावे आणि ४५ वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून रहावे लागत आहे.

Water Issue
Water Scarcity : अपेक्षित असलेल्या गावांपेक्षा कमी अपेक्षित गावात पाणीटंचाई

थोडक्यात महत्त्वाचे...

३०८ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली

दोन मोठे प्रकल्प मृतसाठ्यात

आणखी तीन मोठे प्रकल्प मृतसाठाच्या उंबरठ्यावर

धाराशिवमधील सर्वाधिक ५० लघू प्रकल्प कोरडे, ११ मध्यम प्रकल्प उंबरठ्यावर

मध्यम प्रकल्प, उपयुक्त पाणीसाठा

जिल्हा प्रकल्प संख्या पाणी (टक्के)

छ. संभाजीनगर १६ ८

जालना ७ ६

बीड १६ १९

लातूर ८ ९

धाराशिव १७ ४

नांदेड ९ २१

परभणी २ २

लघु प्रकल्प संख्या आणि उपयुक्त पाण्याची टक्केवारी

जिल्हा प्रकल्प संख्या टक्केवारी

छ. संभाजीनगर ९८ १३

जालना ५७ ०

बीड १२६ ९

लातूर १३४ ११

धाराशिव २०६ ९

नांदेड ८० ३४

परभणी २२ ६

हिंगोली २७ १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com