Water Shortage : मराठवाड्यातील ६४ लघू,२ मध्यम प्रकल्प कोरडे

Water Crisis : मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या, प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर आला आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या, प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर आला आहे. पाण्याअभावी कोरड्या पडणाऱ्या मराठवाड्यातील प्रकल्पांची संख्या वाढते आहे. जवळपास ६४ लघू व २ मध्यम प्रकल्प आजच्या घडीला कोरडे पडले आहेत.

मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पातील ४६ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पातील २३ टक्के, ७४९ लघू प्रकल्पातील २४ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ४६ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ३९ टक्के उपयुक्त पाणी साठ्याचा समावेश आहे.

Water Shortage
Water Crisis : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ४२ टक्क्यांवर

११ मोठ्या प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत आजच्या घडीला निम्माच आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव प्रकल्पात केवळ ८ टक्के, तर निम्न तेरणा प्रकल्पात १३ टक्के तसेच निम्न दुधना प्रकल्पात १९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठाही ४३ टक्क्यांवर आला आहे.

येलदरी प्रकल्पात ५८ टक्के, निम्न मनार प्रकल्पात ५७ टक्के, विष्णुपुरी प्रकल्पात ८१ टक्के तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ७८ टक्के ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पात ७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

कोरड्या पडलेल्या ६४ लघू प्रकल्पात धाराशिवमधील सर्वाधिक ३४, बीडमधील १७, छत्रपती संभाजीनगर मधील ९ लातूरमधील ४ लघू प्रकल्पांचा समावेश आहे, तर कोरड्या पडलेल्या २ मध्यम प्रकल्पात बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

Water Shortage
Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट

जालन्यातील लघू, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा दयनीय

जालना जिल्ह्यातील ५७ केवळ ४ टक्के, तर ७ मध्यम प्रकल्प केवळ १२ टक्के उपयुक्त पाणी आहे. छत्रपती संभाजीनगर मधील १६ मध्यम प्रकल्पात २३ टक्के उपयुक्त पाणी आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात ३५ टक्के, तर १२६ लघू प्रकल्पात २१ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

लातूर जिल्ह्यातील १३४ लघू प्रकल्पामध्ये २१ टक्के, तर ८ मध्यम प्रकल्पात १८ टक्के उपयुक्त पाणी आहे. धाराशिवमधील २०६ लघू प्रकल्पात १५ टक्के, तर १७ केवळ १० टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

नांदेडमधील ८० लघू प्रकल्पात ७४ टक्के, तर ९ मध्यम प्रकल्पात ४९ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. परभणीमधील २ मध्यम प्रकल्पात १६ टक्के, तर २२ लघू प्रकल्पात १२ टक्के उपयुक्त पाणी आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पात ६५ टक्के उपलब्ध पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com