Water Usage: तीन महिन्यात ६२.१३ टीएमसी पाण्याचा वापर; जिल्ह्यात १४०.५४ टीएमसी साठा, रब्बीसाठी विसर्ग सुरू

Water Management: रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी करण्यात येत आहे. धरणांतील पाणी पातळीत हळूहळू घट होत आहे. गेल्या तीन महिन्यांत जवळपास ६२.१३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Pune News: रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी करण्यात येत आहे. धरणांतील पाणी पातळीत हळूहळू घट होत आहे. गेल्या तीन महिन्यांत जवळपास ६२.१३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील २६ धरणांत एकूण १४०.५४ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. येत्या काळात पाण्याची मागणी वाढल्यानंतर या पाणीसाठ्यात आणखी घट होणार असून उन्हाळ्यात नागरिकांना व शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.

यंदा जून ते ऑक्टोबर या महिन्यांत कमीअधिक पाऊस पडला असला तरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही सुरुवातीपासून चांगल्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांत पाण्याची वेगाने आवक वाढल्याने अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी आहे. त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला होता.

Water Storage
Water Storage : यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांत ६६ टक्के जलसाठा

त्यातच परतीच्या पावसामुळेही धरणांतील पाणी पातळीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झाली होती. मुठा खोऱ्यातील टेमघर, खडकवासला या धरणांतील पाणीसाठा कमीअधिक असून वरसगाव, पानशेत ही धरणे शंभर टक्के भरली होती. निरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, वडीवळे वगळता कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, निरा देवघर, वीर ही धरणे शंभर टक्के भरली होती.

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह वगळता येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड ही धरणेसुद्धा शंभर टक्के भरली होती. मुळशी, विसापूर या धरणांत शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला असून उजनी धरणांत शंभर टक्क्यांहून अधिक म्हणजेच १११ टक्के पाणीसाठा झाला होता.

Water Storage
Water Storage : धाराशिव जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील पाणीसाठा ७५ टक्के

पश्चिम पट्यात असलेल्या धरणांतून पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालाही या धरणांतूनही पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, डिंभे, विसापूर, उजनी या धरणांतून रब्बी हंगामासाठी कालव्याला पाणी विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे.  

धरणनिहाय असलेला पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :

टेमघर ०.४९

वससगाव १०.२०

पानशेत ७.५५

खडकवासला १.२०

पवना ५.७३

कासारसाई ०.३८

कळमोडी १.४४

चासकमान ५.५२

भामा आसखेड ५.४४

आंद्रा २.०१

वडिवळे ०.९२

शेटफळ ०.५४

नाझरे ०.३४

गुंजवणी ३.१७

भाटघर १९.४३

निरा देवघर ८.६२

वीर ४.३३

पिंपळगाव जोगे १.९७

माणिकडोह ३.९३

येडगाव १.४१

वडज ०.८७

डिंभे ८.५४

चिल्हेवाडी ०.७६

घोड ३.२६

विसापूर ०.६५

उजनी ४१.४६  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com