
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील छोट्या आणि मोठ्या प्रकल्पांत आजघडीस ६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के जलसाठा कमी आहे.
आता उन्हाळ्याची चाहूल लागत असून, उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच काटकसर न केल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ जिल्हावासीयांवर येण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी मॉन्सूनचे आगमन विलंबाने झाले. परंतु जिल्ह्यात वार्षिक सरासरीहून अधिक पाऊस कोसळल्याचे नोंद घेण्यात आली आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील जवळपास सर्वच नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत होते. तर मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प ओव्हर फ्लो झाले होते.
उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार पाणी आरक्षणसुद्धा करण्यात आले होते. सध्या सात मोठ्या प्रकल्पांत २००.४० दलघमी म्हणजे ७९.७७ टक्के, तर ६५ लघू प्रकल्पांत ५४.५६ टक्के मिळून ६५.९२ टक्के साठा शिल्लक आहे.
सर्वाधिक ७९ टक्के जलसाठा पूस प्रकल्पात
जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाला. जुलैमध्येच मोठ्या तिन्ही प्रकल्पांतील पाणी पातळीत वाढ झाली होती. आता यातील बेंबळा प्रकल्पात ५६.१० टक्के, अरुणावती ६५.०७ तर सर्वाधिक ७९.०८ टक्के पूस प्रकल्पात जलसाठा आहे.
तिन्ही मोठ्या प्रकल्पांत आजघडीस ६५.२४ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या तिन्ही प्रकल्पांत आजघडीला ६७.६६ टक्के जलसाठा असल्याची नोंद आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.