
Beed News : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसील कार्यालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत ६ प्रकरणे मंजूर, तर ७ प्रस्ताव त्रुटींमुळे परत पाठविण्यात आले. यापूर्वीही १६ प्रकरणे समितीकडून मंजूर करण्यात आल्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले.
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे, पाण्यात बुडून मृत्यू, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बरेच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते.
अशा अपघातग्रस्त शेतकरी त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. तहसीलदार मुंडे यांनी योजनेच्या अर्जातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करून प्रस्ताव पाठवावेत.
अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन योजनेची माहिती व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी पौळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रतिनिधी कराड, सोमनर, यादव, नागरगोजे, निखिल मुंडे यांच्यासह कृषी विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
याकडे द्या लक्ष
शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किंवा अपघाताच्या सहा महिन्यांच्या आत विमा अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित कृषी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. पात्र कुटुंबीयांना या योजनेतून दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार असून अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्तावांची सद्यःस्थिती
एकूण प्राप्त प्रस्ताव १७
मंजूर प्रस्ताव ०६
त्रुटीमुळे रखडलेले प्रस्ताव ०७
नामंजूर प्रस्ताव ०३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.