Jaykwadi Water : जायकवाडीत आले ५.६३ टीएमसी पाणी

Water Crisis : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार नगर, नाशिक भागातील धरण समूहातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता. ३०) थांबविण्यात आला.
Jaykwadi Water Issue
Jaykwadi Water Issue Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार नगर, नाशिक भागातील धरण समूहातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता. ३०) थांबविण्यात आला.

त्यानंतर रविवारी (ता. ३) सकाळपासून प्रकल्पात येणारी आवकही थांबली आहे. बुधवारी (ता. ६) सकाळी ६ वाजता पाणीसाठा ४५.४३ टक्क्यावर आला होता. माहितीनुसार जवळपास ५.६३ टीएमसी पाण्याची आवक जायकवाडी प्रकल्पात झाली.

या आवकमध्ये झालेल्या जोरदार पावसाने झालेल्या आवकेचाही समावेश आहे. आलेल्या पाण्यामुळे सोमवारी (ता. ४) सकाळी ६ वाजता जायकवाडीतील पाणीसाठा ४५.६८ टक्क्यांवर होता. नाशिक, नगर भागातील मुळा धरण समूह, प्रवरा धरण समूह, गंगापूर धरण समूह व गोदावरी दारणा धरण समूहातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालक यांनी ३० ऑक्टोबरला दिले होते.

त्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील २४-२५ तारखेपासून नाशिक, नगर भागातील विविध प्रकल्पातून टप्प्याटप्याने जायकवाडीच्या दिशेने आदेशित पाणी सोडणे सुरू झाले. याच दरम्यान पाणी येण्याच्या मार्गात तसेच जायकवाडी लाभक्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक नाशिक, नगर भागातील पाणी येण्याआधीच सुरू झाली होती.

Jaykwadi Water Issue
Jaykwadi Water : जायकवाडीतील पाण्याची आवक घटली

मंगळवारी (ता. २८) सायंकाळी ६ वाजता जायकवाडीत २६ हजार ८२६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. बुधवारी सकाळी सहा वाजता ती आवक २३ हजार ४४५ क्युसेकवर आली. बुधवारी (ता. २९) सकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्पात २३ हजार ४४५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

Jaykwadi Water Issue
Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुणे विभागातील ६३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता जायकवाडी प्रकल्पात १४ हजार ५८९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यावेळी प्रकल्पातील पाणीसाठा ४४.५२ टक्क्यांवर पोहोचला होता. १ डिसेंबरला सकाळी ६ वाजता प्रकल्पात पाण्याची १४ हजार ९६३ क्युसेकने आवक सुरू होती. त्यावेळी प्रकल्पातील पाणीसाठा ४५.३१ टक्क्यांवर पोहोचला होता.

३ डिसेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्पात येणारी आवक केवळ ३४२ क्युसेकने सुरू होती. काही वेळानंतर ती पूर्णतः थांबली.६ डिसेंबरला सकाळी ६ वाजता जायकवाडी प्रकल्पातील उपायुक्त पाणीसाठा ४५.४३ टक्के इतका होता.

तर प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने माजलगाव प्रकल्पासाठी पाण्याचा विसर्ग सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार, पाणी सोडल्यानंतर विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे ८.६ टीएमसी ऐवजी ७.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा सुधारित निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पाणी सोडण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com