
Chh. Sambhjainagar News : बिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजनेस छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आजपर्यंत २९३३ ग्राहकांनी ५ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी भरली आहे. त्यांना व्याज आणि विलंब आकार माफी व एकरकमी मूळ थकबाकी भरल्याने तब्बल २ कोटी ७२ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत थकित बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही.
योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर आहे. ३१ मार्चपूर्वी थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित झालेले छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील ३ लाख २३ हजार ५५५ ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची ५७१ कोटी ६३ लाखांची रक्कम तसेच १७५ कोटी २३ लाख रुपये व्याज आणि ७ कोटी २३ लाख रुपये विलंब आकार येणे आहे.
योजनेचा असा लाभ घ्या
संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवरून किंवा महावितरणच्या मोबाइल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात.
योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल. ज्या ग्राहकांना आपल्या वीजबिलाबाबत शंका किंवा तक्रार असेल त्यांनी महावितरणकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.