
Pune News : वीजबिल थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संपूर्ण व्याज व विलंब आकार शुल्काची माफी असलेल्या महावितरण अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ९ हजार ६९८ ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती महावितरण विभागाच्या सूत्रांनी दिली.
थकबाकी असलेल्या जागेवर सध्या विजेची गरज नसली, तरी अभय योजनेचा फायदा घेत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीला प्राधान्य देत ४ हजार ११४ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी नसल्याचे अर्जात नमूद केले आहे, तर उर्वरित ५ हजार ५८३ ग्राहकांनी मात्र नवीन वीजजोडणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही अभय योजना आहे.
विशेष म्हणजे केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे किंवा मूळ थकबाकीची सुरुवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे.
सोबतच मागणीनुसार नवीन वीजजोडणी घेण्याची सोय उपलब्ध आहे. ही योजना १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत असल्याने थकबाकीमुक्तीच्या या योजनेचे केवळ ५७ दिवस शिल्लक आहेत. या योजनेत पुणे ४६१७, सातारा ४५५, सोलापूर १४३९, कोल्हापूर ११०२, सांगली जिल्ह्यातील २८५ थकबाकीदारांनी सहभाग घेतला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.