
Pune News: चास-कमान धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (ता. ७) धरणातून अतिवाहकाद्वारे भीमा नदीपात्रात सुमारे ४०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे.
पावसाचा वेग व धरणात आवक होणारा पाणीसाठा पाहता गरज पडल्यास धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी भीमा नदीपात्रात जाऊ नये, नदीच्या कडेला असलेल्या विद्यूत मोटरी, इंजिन तसेच शेती अवजारे अथवा जनावरे असल्यास सुरक्षित स्थळी हवलविण्याचे आवाहन धरण प्रशासन विभागाच्या वतीने उपअभियंता शुभम सुसूंद्रे यांनी केले आहे.
धरणात सद्यःस्थितीत ७९.१३ टक्के ६.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून पाणीसाठा शंभर टक्क्यांकडे झेपावला आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने वेगाने पाणीसाठ्यात वाढझाल्यास अचानक नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.
चालू वर्षी मे महिन्यापासूनच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला आहे, गतवर्षी हाच पाणीसाठा केवळ १०.७१ टक्के होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.