
Sangali News : सांगली : जिल्ह्यातील ३३३ अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातून दर दिवशी सुमारे १६०० युनिट वीज निर्मिती होणार आहे. या अंगणवाड्यांची सध्याची विजेची गरज ही सुमारे सातशे ते आठशे युनिट आहे.
त्यामुळे उर्वरित वीज महामंडळाकडे राखीव असणार आहे. भविष्यात विजेवरील उपक्रम वाढल्यास या विजेचा उपयोग होणार आहे.जिल्ह्यात एकूण २७८२ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी सुमारे ५०० अंगणवाड्यांमध्ये सध्या वीजेची सोय आहे.
अंगणवाड्यांचे कामकाज दिवसा असल्याने त्यांना विजेची फारशी गरज पडत नाही. परिणामी अंगणवाड्यांना वीज पुरवठ्याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु अंगणवाड्यांमध्येही आता आधुनिक सुविधा येत आहेत. विजेवर चालणारे वजनकाटे, शिक्षणासाठी प्रोजेक्टर, संगणक या गोष्टींचीही गरज पडत आहे. तसेच पंखे, शुद्ध आणि स्वच्छ पाण्यासाठी आवश्यक विजेची उपकरणेही आता वापरण्यात येत आहेत येत आहेत.
या सर्व उपक्रमांसाठी विजेची गरज वाढली आहे. अंगणवाड्यांना वीजपुरवठ्याची सोय नाही. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने ३३३ अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा संयंत्र बसवण्यासाठी प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठविला. या प्रस्तावाला मंजुरी मिळून पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यातून प्रत्येक अंगणवाडीमध्ये एक किलो वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे. यातून या अंगणवाड्या उजळून निघणार आहेत.
सध्या अंगणवाड्यांना दररोज सुमारे दोन ते तीन युनिट विजेची गरज पडते. भविष्यात या अंगणवाड्यांमध्ये विजेची उपकरणे वाढल्यास गरजही वाढू शकते हे लक्षात घेऊन प्रत्येक अंगणवाडीच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून किमान पाच मिनिट विजेची निर्मिती होईल अशा या उद्देशाने प्रत्येक अंगणवाडीवर एक किलोवॅटचे सौर ऊर्जा संयंत्र बसवण्यात आले आहे.
सर्व ३३३ ग्रामपंचायतींवर सौर ऊर्जा संयंत्र बसवले आहे. आता वीज महामंडळाकडून वीज मीटर येणे बाकी आहे. काही ठिकाणी वीज मीटरही बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
सौर ऊर्जा संयंत्र बसवण्यात आलेल्या सर्व अंगणवाड्यांमध्ये मिळून एकूण सुमारे १६०० युनिट तयार होणार आहे. तर या अंगणवाड्यांची एकूण गरज ही जवळपास ७०० ते ८०० युनिट इतकी आहे. त्यामुळे उरलेली सुमारे ९०० युनिट वीज महामंडळाकडे राखीव असेल. अंगणवाड्यांमध्ये बसवण्यात आलेल्या जनरेशन मीटरमधून वीज महामंडळाला किती युनिट वीज गेली याची माहिती मिळणार आहे.
जिल्ह्यातील ३३३ ग्रामपंचायमध्ये सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. तथापी विजेचे मीटर बसवण्याचे काम सुरू आहे ते लवकर पूर्ण होईल. यामुळे अंगणवाड्यांना वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अंगणवाडीमधील विजेवर चालणाऱ्या उपकरणांना त्याचा लाभ होईल.
- संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.