Marathwada Water Storage : मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्क्यांवर

Water Shortage : मराठवाड्यातील एकूण ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला आहे.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये मोठ्या प्रकल्पातील ४० टक्के, उपयुक्त पाणीसाठ्यांसह मध्यम प्रकल्पातील २३ टक्के, लघू प्रकल्पातील १७ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यातील २६ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यातील ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

गतवर्षीच्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन पाणीसाठा बहुअंशी तुडुंब झाले. मात्र हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागल्यापासून मराठवाड्यातील पाणी टंचाईने थोडे थोडे डोके वर काढणे सुरू केले आहे. पाण्याचा वाढलेला उपसा व उन्हाची तीव्रता यामुळे पाणी साठ्यातील पाणी झपाट्याने कमी होत गेले. आजच्या घडीला सर्वाधिक संख्येने असलेल्या मराठवाड्यातील लघू प्रकल्पांची पाणीसाठा स्थिती दयनीय आहे. ७५१ लघू प्रकल्पांत केवळ १७ टक्के उपयुक्त पाणी असणे दयनीयतेची परिचिती देते आहे.

दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पांची स्थिती फारशी चांगली नसून या प्रकल्पांमध्येही केवळ २३ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत सर्वांत कमी केवळ ४ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील १२६ प्रकल्पांत ११ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत १२ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ प्रकल्पांत १५ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत १७ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पांत १८ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पांत २१ टक्के, तर लातूरमधील १३५ लघू प्रकल्पांत २२ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पापैकी जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत सर्वांत कमी केवळ १७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यातील ८ प्रकल्पांत २० टक्के, परभणीतील दोन प्रकल्पांत २२ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत २३ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पांत २४ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पांत २५ टक्के, तर नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत २७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

Water Crisis
Water Crisis : पाण्याची बचत अन् काटकसर ही काळाची गरज

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी हिंगोलीतील सिद्धेश्‍वर प्रकल्पात सर्वांत कमी ८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. त्यापाठोपाठ माजलगावमध्ये १३ टक्के, सीनाकोळेगावमध्ये ३१ टक्के, मांजरा व विष्णुपुरीत प्रत्येकी २७ टक्के, निम्न दुधनामध्ये ३४ टक्के, जायकवाडीत ३९ टक्के, निम्न मनारमध्ये ४५ टक्के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ४९ टक्के, निम्न तेरणामध्ये ५२ टक्के, तर येलदरीत सर्वाधिक ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

Water Crisis
Water Crisis : पाणीटंचाई एकाला, निधी टाकला दुसऱ्या गावाला

२७ लघू मध्यम प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी धाराशिवमधील एक, तर ७५१ लघू प्रकल्पांपैकी जालना व लातूरमधील प्रत्येकी ३, बीडमधील ७, धाराशिव व हिंगोलीतील ४ मिळून २६ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत.

२३८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील २१८ लघू व १० मध्यम प्रकल्प मिळून २३८ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघू प्रकल्पात जालन्यातील २७, धाराशिव व बीड मधील प्रत्येकी ६०, लातूरमधील १५, नांदेडमधील ३२ व परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील प्रत्येकी १२ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या १० मध्यम प्रकल्पांमध्ये नांदेड व बीड मधील प्रत्येकी ३, धाराशिवमधील २, तसेच जालना व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com