Crop Damage : अमरावती विभागात २४३ कोटी रुपयांचे नुकसान

Hailstorm Crop Damage : गेल्या दोन महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत पाऊस, गारपीट मोठे नुकसान झाले होते.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Amaravati News : गेल्या दोन महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत पाऊस, गारपीट मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करीत राज्य शासनाला पाठविला आहे. यामध्ये २४३ कोटी ४० लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान दर्शविले आहे.

मार्च आणि एप्रिल महिना हा विदर्भात वाढत्या तापमानासाठी प्रसिद्ध आहे. परंतु वातावरणातील बदलाच्या कारणामुळे या दोन्ही महिन्यात सातपेक्षा अधिक वेळा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान तीन ते चार वेळा गारपिटीची देखील नोंद झाली.

या पाऊस वाऱ्याचा तसेच गारपिटीचा फटका रब्बी हंगामातील काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांसोबतच भाजीपाला आणि फळ पिकांनाही बसला. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा हे पाचही जिल्हे पाऊस, गारपिटीमुळे प्रभावित झाले.

Crop Damage
Crop Damage : नगर जिल्ह्यात एका महिन्यात पावसाने दोनशे हेक्टरवर नुकसान

प्रशासनाकडून या पाचही जिल्ह्यात सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्या आधारे नुकसान देखील अंतिम करण्यात आले आहे. पाचही जिल्ह्यांत एक लाख १५ हजार २१६ शेतकऱ्यांचे ७६ हजार २८९.३२ हेक्टरवरील मुख्य पिके तसेच फळ पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील संत्रा, मोसंबी तसेच लिंबू पिकांची यामुळे हानी झाली. प्रशासनाने एकूण भरपाईचा अहवाल राज्य शासनाला पाठविला असून निधी मंजूर होताच शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

लोकप्रतिनिधींमुळे सर्वाधिक भरपाई

अमरावती जिल्ह्यात आमदार बच्चू कडू, यशोमती ठाकूर यांच्यासह बहुतांश आमदार शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण आणि पंचनाम्यासाठी आग्रही असतात. त्यामुळेच पाचही जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान अमरावतीमध्ये नोंदविण्यात आले आहे.

पाच जिल्ह्यांसाठी मंजूर एकूण रक्कम २४३ कोटीपैकी १५४ कोटी ७८ लाख २१ हजार रुपयांचे नुकसान एकट्या अमरावती जिल्ह्यात दर्शविण्यात आले आहे. उर्वरित चार जिल्ह्यांत केवळ ८९ कोटींची मदत दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळेच यापूर्वी देखील संत्रा फळगळतीसाठी केवळ अमरावती जिल्ह्यातच भरपाई देण्यात आली आहे हे विशेष उल्लेखनीय.

Crop Damage
Crop Damage : खानदेशात वादळात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी

अमरावतीत फळगळती भरपाईच्या कक्षेत

पाऊस, गारपीट झाल्यानंतर फळाच्या देठाजवळ बुरशी वाढत फळगळती होते त्याला. पाऊस पडून गेल्यावर साधारणतः दोन ते तीन दिवसांनी गळती होते. मात्र पिकाचे नुकसान तत्काळ होत असल्याने सर्वेक्षण व पंचनाम्यात केवळ पिकाचीच नोंद करणे शक्य होते. फळगळतीचा समावेश करताना अशा प्रकारे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. परंतु यापूर्वी अमरावतीत फळगळती देखील भरपाईच्या कक्षेत आणत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत रक्कम ही जमा झाली. अमरावतीच्या सीमेलगत असलेल्या नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील शेतकरी मात्र संत्रा फळगळतीच्या मदतीपासून वंचित राहिले.

..असे आहे जिल्हानिहाय नुकसान

अमरावती १५४ कोटी ७८ लाख २१ हजार

अकोला ३२ कोटी ९५ लाख ९६ हजार

बुलडाणा २५ कोटी २१ लाख ६७ हजार

यवतमाळ २३ कोटी ६५ लाख १४ हजार

वाशीम ६ कोटी ७९ लाख ५० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com