
Yavatmal News : विदर्भ आणि मराठवाडा सीमारेषेवरील ईसापूर वन्यजीव अभयारण्यासाठी जमिनी अधिग्रहित करण्यास विलंब होत आहे. परिणामी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या २२० हेक्टर शेतजमिनी पडीक पडल्या आहेत. अभयारण्याला लागून असलेली शेती पिकांचे वन्यप्राणी प्रचंड नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे.
पुसद तालुक्यातील इसापूर वन्यजीव अभयारण्याची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने २७ ऑगस्ट २०१४ रोजी जाहीर केली. त्यानुसार ईसापूर धरण परिसरात दाट जंगल असून पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे वन्यजीवांसाठी हा परिसर आरक्षित करण्यात आला. एकूण ८५७.४ हेक्टर आर अधिसूचित क्षेत्राचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांनी वनखात्याला कळविले आहे.
ईसापूर वन्यजीव अभयारण्याची अधिसूचना जाहीर झाल्यापासून आजतागायत ११ वर्षे लोटली आहे. अभयारण्यामुळे शेतकऱ्यांची झालेली ही दयनीय अवस्था तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही कानावर घालण्यात आली तसेच तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचीही पीडित शेतकऱ्यांनी भेट घेतली. उपविभागीय अधिकारी तसेच वन अधिकारी यांच्याशी वेळोवेळी बैठकी पार पडल्या. परंतु शेतजमीन अधिग्रहणाचा प्रश्न काही सुटलेला नाही.
अभयारण्याकरिता जमीन अधिग्रहित करावयाच्या गावातील शेतकऱ्यांची संख्या
जाम नाईक १. ८३
ईसापूर ३९
अनसिंग १७
सुकळी ६
गौळमांजरी ८२
उटी ८
एकूण शेतकरी २४५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.