Water Level : एक महिन्यात १६.९ टीएमसी पाण्याचा वापर ; धरणांत १५१.७१ टीएमसी पाणीसाठा

Dam Water Storage :रब्बी हंगाम सुरू असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेबर महिन्यात पाण्याचा वापर काही प्रमाणात वाढला आहे.
Water Level
Water LevelAgrowon

Pune News : रब्बी हंगाम सुरू असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेबर महिन्यात पाण्याचा वापर काही प्रमाणात वाढला आहे. त्यातच उजनी, वीर, खडकवासला आणि पवना अशा धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. एक महिन्यात जवळपास १६.९ टीएमसी एवढ्या पाण्याचा वापर झाला आहे. पाण्याचा वापर असाच राहिल्यास आगामी काळात पाण्याची टंचाई भासणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Water Level
Solapur News : सोलापुरातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा चालला तळाशी

जिल्ह्यात एकूण २७ धरणे आहेत. यात उजनी धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांची एकूण क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. यंदा सर्व धरणे मिळून १६८.६१ टीएमसी म्हणजेच ८५ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यापैकी सध्या १५१.७१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात या धरणांत २००.८२ टीएमसी म्हणजेच १०१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ४९.११ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे. यात उजनी धरणांतील पाणीसाठ्याचा समावेश होता. जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील जवळपास सर्वच धरणे भरली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याची फारशी अडचण भासणार नसली, तरी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडून कळविण्यात आले होते.

Water Level
Jaykwadi Dam : ऊर्ध्व धरणातून जायकवाडी धरणात तत्काळ पाणी सोडा

यंदा सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली होती. यामुळे जिल्ह्यातील जवळपास १७ धरणे शंभर टक्के भरली. परंतु नऊ धरणांत कमी पाणीसाठा असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे उजनी धरणांतील पाणीसाठा ६० टक्केपर्यत पोहोचला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार असला तरी आगामी काळात इंदापूर तालुका, सोलापूर जिल्ह्यात शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न उभा राहणार असल्याचे चित्र आहे.

धरणातील पाणी स्थिती

सध्या जिल्ह्यातील खडकवासलातून डाव्या कालव्यातून जलवाहिनीद्वारे २४३ क्युसेक, चासकमानमधून डाव्या कालव्याला १००, वीर धरणातून डाव्या कालव्याला ७२७, तर उजव्या कालव्याला १५५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजनीतून डाव्या कालव्याला बोगद्यातून १३५३ क्युसेक, तर उजव्या कालव्याला २७०० क्युसेकने पाणी सोडलेले आहे. याशिवाय टेमघर, पानशेत, खडकवासला, पवना, भाटघर, नीरा देवघर या धरणांतून विद्युतगृहासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात काही प्रमाणात घट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com