Galmukt Dharan Yojana : धरणांतील गाळ काढण्यासाठी १५ कोटींचा आराखडा

Water Conservation : राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लहान-मोठ्या २६७ प्रकल्पांमधून गाळ काढण्यासाठी १५ कोटी ३९ लाखांचा आराखडा मृद्‌ व जलसंधारण विभागाने मंजूर केला आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

Nashik News : राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लहान-मोठ्या २६७ प्रकल्पांमधून गाळ काढण्यासाठी १५ कोटी ३९ लाखांचा आराखडा मृद्‌ व जलसंधारण विभागाने मंजूर केला आहे. त्यामुळे २१ लाख ७७ हजार घनमीटर गाळ काढल्यानंतर जिल्ह्याच्या धरणसाठ्यात एकूण ७७ दलघफू वाढ होणार आहे.

गंगापूर धरणापासून ‘जलसमृद्ध नाशिक अभियाना’स प्रारंभ झाला. त्यानंतर जिल्ह्यातील पाझर तलाव, छोटे-मोठ्या बंधाऱ्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे. धरणांमधील गाळ काढून नेण्याचा खर्च देण्यासाठी राज्य सरकारने अनेक अटी-शर्ती असल्यामुळे सीएसआर निधीतून याबाबतचा खर्च करण्याचे नियोजन आहे.

Water Conservation
Galmukt Dharan Scheme : ‘गाळमुक्त धरण’ योजनेअंतर्गत २.९५ लाख घनमीटर गाळ उपसा

गाळ काढण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवली जाणार नसून स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था व वैयक्तिक शेतकरी यांनाही परवानगी दिली जाणारअसल्याचे मृद्‌ व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिभाऊ गिते यांनी सांगितले. दरम्यान, मागील काळात या योजनेबाबतचा अनुभव लक्षात घेता या बंधाऱ्यांमधून काढलेला गाळ स्वखचनि कोण वाहून नेणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नाशिक जिल्ह्यात मागील पावसाळ्यात सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस पडला असून, अनेक धरणे तळाला गेली आहेत. तसेच बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने गंगापूर या मोठ्या धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून निधी मिळवला जात आहे.

गंगापूर धरणातून गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग व मृद्‌ व जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग यांनीही गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून गाळ काढून तो वाहून नेण्याच्या कामांचा आराखडा तयार केला आहे.

Water Conservation
Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात पहिला

या आराखड्यानुसार जिल्हा मृदा व जलसंधारण विभागाकडून १०६ बंधाऱ्यांमधून १०.६४ लाख घनमीटर गाळ काढला जाणार असून, त्यासाठी ६.४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनीही २५ मध्यम व मोठ्या धरणांमधून ३६.४३ हजार घनमीटर गाळ काढण्याचा आराखडा तयार केला असून त्यासाठी ४.८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

...असा आहे आराखडा

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने १३१ बंधाऱ्यांमधून ५.२४ लाख घनमीटर गाळ काढण्याचा आराखडा तयार केला आहे.यासाठी २.६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मालेगाव पाटबंधारे विभागानेही ५ लहान व मध्यम सिंचन प्रकल्पांमधून २.२३ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. यासाठी २.३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे सर्व विभाग मिळून २६७ प्रकल्पांमधून २१ लाख ७७ हजार घनमीटर गाळ काढणार असून, त्यासाठी १५ कोटी ३९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com