Ujani Dam : दीड महिन्यात उजनीतून सोडले १०० टीएमसी पाणी

Ujani Water Storage : उजनीतून सोडलेल्या पाण्यातून सर्व बंधारे भरून घेण्यात आले आहेत. दुसरीकडे ६ ऑगस्टपासून डावा व उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले असून ते अद्याप सुरू आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Solapur News : पावसाळा सुरु होऊनही २६ जुलैपर्यंत उणे साठ्यात असलेल्या उजनी धरणातून ४ ऑगस्टपासून तब्बल १०० टीएमसी पाणी भीमा नदी व कॅनॉलमधून सोडून देण्यात आले आहे. धरणात सध्या १२१ टीएमसीपर्यंत (१०७ टक्के) पाणी आहे.

उजनी धरण ते सोलापूर (औज) असे २४० किलोमीटर अंतर असून या अंतरावर एकूण २० बंधारे आहेत. चिंचपूर व औज हे कर्नाटक व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे बंधारे आहेत. उजनीतून सोडलेल्या पाण्यातून सर्व बंधारे भरून घेण्यात आले आहेत. दुसरीकडे ६ ऑगस्टपासून डावा व उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले असून ते अद्याप सुरू आहे.

पण, जिल्हाभर कमी- अधिक प्रमाणात पाऊस असल्याने कॅनॉलचे पाणी शेतकरी घेत नसल्याची स्थिती आहे. तेही पाणी नदीला मिळत आहे. एकूणच ४ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर या दीड महिन्यात उजनीतून पूरनियंत्रणासाठी टप्प्याटप्प्याने १०० टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे.

Ujani Dam
Ujani Dam : ‘उजनी’च्या पाण्यावर २२ दिवसांत ६६ लाख युनिट वीजनिर्मिती

उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १२३.५८ टीएमसी आहे. सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी पावणेतीन टीएमसी पाणी कमी आहे, पण पूरनियंत्रणामुळे तेवढी जागा राखीव ठेवली जात आहे. १० ऑक्टोबरदरम्यान धरणातून पाणी सोडणे पूर्णत: बंद होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार आहे.

दोन लाख हेक्टरची चिंता दूर

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार हेक्टर जमिनीला थेट उजनी धरणातून पाणी मिळते. याशिवाय १०० हून अधिक ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा उजनीवर अवलंबून असून एकूण ४२ योजनांना उजनीतून पाणीपुरवठा होतोय.

जिल्ह्यातील एकरूख, सांगोला, देगाव, शिरापूर अशा सर्व उपसा सिंचन योजनांमधून आणखी एक लाख हेक्टरला उजनीचे पाणी मिळणार आहे. यंदा धरण ओव्हरफ्लो झाल्याने उन्हाळ्यात शेतीला आवश्यकतेनुसार पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे.

Ujani Dam
Ujani Dam : ‘उजनी’तून ‘भीमे’तील विसर्ग थांबला, धरणाचे १६ दरवाजे बंद

ठळक बाबी...

  • २५ जुलैपर्यंत उजनी धरण उणे साठ्यातच होते, २६ जुलैला धरण प्लसमध्ये (उपयुक्त साठ्यात) आले

  • उजनी धरणातून ६ ऑगस्ट‌पासून सोडले कॅनॉलमधून पाणी; आता १० ऑक्टोबरला बंद होणार कॅनॉलचे पाणी

  • धरणातून सध्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून १७५ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचनमधून ८० क्युसेक, बोगद्यातून ८० क्युसेक पाणी

  • मुख्य कालव्यातून १६०० क्युसेक पाणी; धरणावरील विद्युत प्रकल्पाचे पाणी शनिवारपासून बंद

उजनी धरणाची सद्य:स्थिती

एकूण पाणीसाठा

१२०.६० टीएमसी

उपयुक्त पाणीसाठा

५६.९७ टीएमसी

दौंडवरून येणारा विसर्ग

२३०० क्युसेक

उजनीतून सोडलेला विसर्ग

२१०० क्युसेक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com