
Weather forecast : राज्यात १५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान झालेल्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दरम्यान मागच्या ३ दिवसांपासून घाट माथा सोडल्यास पावसाने दडी मारली आहे. राज्यातील काही ठिकाणी तर तापमान वाढल्याचे दिसून आले. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकण विभाग सोडल्यास ०८ ऑगस्टपर्यंत पाऊस असणार आहे.
०८ ऑगस्टनंतर राज्यात ७० टक्के भागातून पाऊस कमी असणार आहे. दरम्यान, राज्यात फक्त कोकण विभागात १० ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कमी झाला आहे. फक्त कोकण भागात पावसाचा जोर कायम असून, तेथे १० ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
दरम्यान पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतेत आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार, आज राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यानुसार रायगड, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
तर सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात उर्वरित महाराष्ट्रामध्ये वातावरण सामान्य असून पाऊस त्याचा जोर कमी असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तेथे दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज आहे. तसेच ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगडपर्यंतच्या भागात ८ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. त्यानंतर पूर्वोत्तर भारत वगळता संपूर्ण देशात पावसाचा जोर कमी होणार आहे. तर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात किरकोळ पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.