
Nashik News नाशिक : ‘‘प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीमध्ये संकल्प केल्यास यशस्वी होत असल्याचा अनुभव आहे.'शत प्रतिशत'चा नारा भाजपने (BJP) येथेच दिला होता, तो यशस्वी झाला. भाजप प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.
आता रामाचा आशीर्वाद घेऊन महाविजयाचा मंत्र घेऊन विधानसभेच्या दीडशे नव्हे तर दोनशे जागा निवडून आणूच,’’ असा निर्धार शनिवारी (ता.११) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी केला.
भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारणी बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारमुळे राज्याची अडीच वर्षे वाया गेली. गद्दारांमधून सकारात्मक खुद्दार बाहेर पडले.
आमचे सरकार कायदेशीर आहे. भीतीमुळे ते बेकायदेशीर असल्याचा अपप्रचार केला जातो. जे दहा-पंधरा उरले आहेत. त्यांना थांबविण्यासाठी हा संदेश दिला जातो. परंतु सर्वोच्च न्यायालय आपल्याच बाजूने निर्णय देईल.
विरोधकांकडून देशाच्या सर्वोच्च संस्थांना बदनाम केले जात आहे. आमचे सरकार हा कार्यकाळ पूर्ण करेलच, परंतु भविष्यात आतापेक्षा दीडपट जास्त जागांवर निवडून येवू.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.