
यवतमाळ : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे. असे असतानाही काही भागांत पाणीटंचाई (Water Shortage) भासण्याची शक्यता आहे.
यासाठी संभाव्य पाणीटंचाई (Water Scarcity) कृती आराखडा तयार करण्यात केला जाणार आहे. यात विहीर अधिग्रहण, टँकर यांसह विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या असून, पुसद, उमरखेड, महागाव व घाटंजी या चार तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. असे असतानाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. गेल्या वर्षी पाचशेच्या वर गावांत टंचाईच्या दृष्टीने विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. यासाठी जवळपास आठ कोटी रुपयांच्या संभाव्य टंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती.
टंचाई आराखड्यातून विंधन विहीर कार्यक्रम, तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहण, टँकर आदी उपाययोजना करण्यात आल्या. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला. सर्वत्र ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
उमरखेड, पुसद, महागाव भागात टंचाई कायमच
जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, महागाव या माळपठार भागात कायमच टंचाई डोके वर काढते. याशिवाय घाटंजी तालुक्यातील काही भागात टंचाई दिसतेच. जिल्ह्यातील काही भाग ‘ड्राय’झोन असल्याने टंचाई डोके वर काढतेच. या भागातील नागरिकांना टंचाईचे चटके बसू नये, यासाठी उपाय योजना करतात. यंदाही याच भागातील गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.