
Jalgaon News जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा अधिकच लांबण्याची शक्यता आहे. यामुळे जुलै ते ऑगस्टमध्ये पाणीटंचाई (Water Shortage) निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण यंत्रणेने वर्तविली आहे. यामुळे वरील महिन्यांत ५५६ गावांत पाणीटंचाईचा प्राथमिक अंदाज आहे.
टंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन कोटी ४२ लाख रुपयांचा विशेष टंचाई कृतिआराखडा तयार केला आहे. लांबणारा पाऊस लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला यंदा दोन टंचाई आराखडे तयार करावे लागले आहेत.
एप्रिल ते जूनदरम्यान जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू नये, यासाठी दोन कोटी ४४ लाख रुपयांचा पहिला संभाव्य टंचाई कृतिआराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आता नुकताच तीन कोटी ४२ लाख रुपयांचा विशेष पाणीटंचाई कृतिआराखडा तयार केला आहे.
जिल्ह्यातील गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तापमानवाढीला काहीअंशी ब्रेक लागला. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्याचे तापमान ४० अंशांखालीच राहिले. असे असले तरी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होईल. अतितापमानाने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.
टंचाईग्रस्त गावे व टँकरची संख्या अशी
मोरगाव, रोटवद, नेरी दिगर (ता. जामनेर) - तीन
तळबंदतांडा, वसंतवाडी (ता. भडगाव) - दोन
एनगाव (ता. बोदवड) - एक
हनुमंतखेडा, खेडीढोक (ता. पारोळा) - दोन
मौजे पिंपळगाव (ता. चाळीसगाव) - दोन
तात्पुरत्या पाणी योजना
मौजे हातगाव भिल्ल वस्ती (ता. चाळीसगाव) व मौजे लोणवाडी बुद्रुक (ता. जळगाव) या दोन ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.