Dam Water Level : चौदा धरणांनी गाठला तळ

Agriculture News : जूनचा अर्धा महिना संपत आला आहे. तरीही जिल्ह्यात पावसास फारशी सुरुवात झालेली नाही. त्यातच गेल्या मे महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे.
Water Level
Water LevelAgrowon
Published on
Updated on

Pune News : जूनचा अर्धा महिना संपत आला आहे. तरीही जिल्ह्यात पावसास फारशी सुरुवात झालेली नाही. त्यातच गेल्या मे महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून चौदा धरणांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

पुणे जिल्ह्यात लहान मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिउष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे.

सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा १९.१९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर टेमघर, कासारसाई, कळमोडी, वडीवळे, शेटफळ, नाझरे, पिंपळगाव जोगे, वडज, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, नाझरे, उजनी या धरणांनी तळ गाठला असून पिंपळगाव जोगे, घोड, उजनी या तीन धरणांत मृत पाणीसाठा शिल्लक आहेत. तर दहा धरणांत अत्यल्प म्हणजेच एक टीएमसीहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर उर्वरित धरणात अल्प पाणीसाठा आहे.

Water Level
Chemically Mix Water : रासायनमिश्रित सांडपाण्यामुळे सिडको परिसरात पिकांची हानी

गेल्या जिल्ह्यातील धरणांत अवघा २३.५२ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. तर याच काळात चौदा धरणांनी तळ गाठला होता. त्यापैकी सहा धरणे कोरडी पडली होती. सध्या खडकवासला धरणातून डाव्या कालव्याला २६५ क्युसेक, तर उजव्या कालव्याला १०५४ क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. वीर धरणातून डाव्या कालव्याला ८२७, तर उजव्या कालव्याला १५५० क्युसेकने आवर्तन सुरू आहे.

Water Level
Water Shortage : जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांत पाणीपातळी अर्धा मीटरने घटली

येडगाव धरणातून डाव्या कालव्याला १४०० क्सुसेक, डिंभेतून ५५० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडले आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ हवामान असून काही ठिकाणी हलका पाऊस होत आहे. परंतु धरणातील पाणीपातळी वाढविण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून येत्या दहा ते पंधरा दिवसांत जोरदार झाल्यास ही धरणे पुन्हा धरणांत पाण्याची आवक सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

टेमघर ०.१४, वरसगाव २.६७, पानशेत १.३६, खडकवासला १.१६, पवना १.८१, कासारसाई ०.१३, कळमोडी ०.३४, चासकमान ०.६२, भामा आसखेड २.००, आंध्रा १.२३, वडीवळे ०.२१, शेटफळ ०.१५, नाझरे ०.०३, गुंजवणी ०.६४, भाटघर १.४०, नीरा देवघर ०.५९, वीर १.९३, माणिकडोह ०.४९, येडगाव ०.७९, वडज ०.११, डिंभे १.२१, चिल्हेवाडी ०.१०, विसापूर ०.०७, मुळशी १.२४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com