
पुणे : ‘‘आम्ही तंत्रज्ञानावर खूप भर दिला आहे. अर्थसंकल्पात (Union Budget) वंचितांना प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांसाठीही विशेष बजेट जाहीर करण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या विकासाला नवी गती देईल."
"या अर्थसंकल्पात ‘एमएसएमई’चीही काळजी घेण्यात आली असून, पेमेंटची नवी व्यवस्थाही करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प आजच्या महत्त्वाकांक्षी समाजाची, गावांची, गरिबांची, शेतकरी आणि मध्यमवर्गाची स्वप्ने पूर्ण करेल,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी व्यक्त केला.
मोदी म्हणाले, ‘‘महिलांच्या राहणीमानात खेड्यापासून शहरांपर्यंत बदल घडवून आणण्यासाठी सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. त्यांना आता अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल."
"या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच देशाने अनेक प्रोत्साहन योजना आणल्या आहेत. अशा लोकांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान, क्रेडिट आणि मार्केट सपोर्टसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.’’
‘‘मध्यमवर्गीयांना देखील दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प कोट्यवधी नागरिकांचे आयुष्य बदलेल. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
ग्रामीण-शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होईल. शेतकऱ्यांना सक्षम बनविणारा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण आधुनिकतेची कास धरायला हवी,’’ असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.