
Bhandara News : तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर राबविले जात आहे. मात्र जिल्ह्यातील चार सूर्यफूल उत्पादकांवर विक्रीसाठी गावोगावी भटकंतीची वेळ आली आहे. सूर्यफूल खरेदीसाठी कोणीच पुढे येत नसल्याने या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
खाद्यतेलाची मागणी अधिक आणि तेलबियावर्गीय पिकांचे क्षेत्र कमी अशा विरोधाभासामुळे केंद्र सरकारला खाद्यतेलाची मोठी आयात करावी लागते. अब्जावधी रुपयांचा खर्च यावर होतो. सुमारे ७० टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते.
परिणामी केंद्र सरकारने ही अवलंबिता कमी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्या अंतर्गत तेलबियावर्गीय पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकर घेण्यात आला आहे. असे असतानाच धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील सालेबर्डी (ता. मोहाडी) गावच्या चार शेतकऱ्यांचा सूर्यफूल विक्री होत नसल्याची स्थिती आहे.
शेतकरी राजेंद्र ठवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासह नानाजी संपत ठवकर, विकास देवदास ठवकर हे सूर्यफूल लागवड करतात. २००७ ते २००९ या कालावधीत त्यांनी यात सातत्य राखले. पुढे दर कमी असल्याने लागवड केली नाही. २००८ मध्ये त्यांना २२०० रुपये क्विंटलचा दर मिळाला.
२०२२-२३ या हंगामात सूर्यफुलाचा हमीभाव ६४०० तर २०२३-२४ मध्ये ६ हजार ७६० रुपये असा झाला. त्यामुळे राजेंद्र यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये सूर्यफुलाची दहा एकरांवर लागवड केली. मार्च २०२३ मध्ये पिकाची काढणी केली. दहा एकरांतून ७० क्विंटल उत्पादन झाले. मात्र आता खरेदीदार मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.