Pavsali Adhiveshan Live updates : विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग ; पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका

Maharashtra Monsoon Session 2023 Live : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
vidhimandal adhiveshan
vidhimandal adhiveshan agrowon
Published on
Updated on

Maharashtra Assembly Session 2023 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. सरकारने दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केल्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

vidhimandal adhiveshan
Maharashtra Monsoon Session LIVE : '५० खोके, एकदम ओके' च्या पुन्हा घोषणा... विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले होते. विधानसभेच्या पायऱ्यावर आक्रमक होत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्यान मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. सन २०२३-२०२४ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. तसेच विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती / राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.

vidhimandal adhiveshan
Maharashtra Monsoon Session 2023 : बोगस बियाणे, खते रोखण्यासाठी कायदे कडक करणारः फडणवीस

बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. ``राज्यात शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. अनेक ठिकाणी अजून पाऊस झालेला नाही. राज्यभरात केवळ २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे. कांदा अनुदान, अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही. मंत्र्यांनी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन आठ दिवसांत मदत देणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु अजूनही मदत मिळाली नाही. मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आणि खते बाजारात आहेत. सरकार म्हणून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. म्हणून दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून गंभीर विषयावर चर्चा करावी,`` असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मागील वर्षाच्या तुलनेत ८० टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरण्यांचं संकट आहे. यासंदर्भात एक समिती बनवण्यात आली आहे. सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर सभागृहाचे नियोजित दैनंदिन कामकाज सुरू ठेवण्यात आले. विरोधकांनी शेतकरी प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहात काहीवेळ गोंधळ झाला होता. त्यानंतर काॅंग्रेस, शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला. विधानसभा अध्यक्षांनी अधिवेशन काळातील तालिका अध्यक्षांना नामनिर्देशित केल्यानंतर विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com