Shirur APMC : शिरूर बाजार समितीत रविवारपासून साडेपाच वाजेनंतर बाजार सुरू होणार

APMC Market : पुणे जिल्ह्याील शिरूर बाजार समितीने रविवार (ता. २७) पासून शेतकरी बाजार दररोज संध्याकाळी ५.३० नंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Shirur APMC
Shirur APMCAgrowon

Pune News : सध्या शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री कोणत्या वेळी करावी व खरेदीदारांना कोणत्या वेळी माल खरेदीसाठी यावे याचे नियोजन लावणे अवघड झालेले आहे. त्यामुळे बाजार घटकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. बाजार समितीने रविवार (ता. २७) पासून शेतकरी बाजार दररोज संध्याकाळी ५.३० नंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजन करून आपला शेतीमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रभारी सचिव अनिल ढोकले यांनी केले.

Shirur APMC
Shirur APMC : शिरूर बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

बाजार समितीच्या वतीने प्रसिद्धिपत्रक काढून शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. त्यामध्ये शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी यार्डवर गेली अनेक दिवसांपासून शेतकरी बाजार नियमित भरत आहे. शेतकरी बाजाराचे वेळेअगोदर दुपारी १ ते २ वाजेपासूनच अनेक शेतकरी, खरेदीदार यार्डवर गर्दी करतात. या वेळी ग्राहकांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताचा विचार करून शिरूर मार्केट यार्डवरील शेतकरी बाजार कृती समिती व बाजार समिती प्रशासन यांच्यामध्ये बैठक होऊन ठरल्याप्रमाणे शेतकरी, खरेदीदार- व्यापारी व बाजार घटक यांच्या सोयीचे दृष्टीने शेतकरी बाजारचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. यामध्ये शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सर्व भाजीपाला उत्पादक शेतकरी, खरेदीदार व बाजार घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

बाजार समितीने असे केले नियोजन :

- शेतकरी बाजारामध्ये शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी ५.३० पर्यंत शेतीमाल विक्रीसाठी आणावयाचा आहे.

- सर्व भाजीपाला- खरेदीदारांनी शेतमाल खरेदीसाठी संध्याकाळी ५.३० नंतर यार्डवर यायचे आहे.

- संध्याकाळी ५.३० च्या अगोदर जर कोणी खरेदीदार शेतीमाल खरेदी करताना आढळला तर त्यास यार्डवर प्रवेश नाकारण्यात येईल.

- यार्डचे बाहेर जर वेळेअगोदर एखाद्या खरेदीदाराने शेतीमाल खरेदी केलेला आहे. असे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

- यार्डवरील ठोक व किरकोळ व्यावसायिकांनी संध्याकाळी ५.३० नंतरच यार्डवर येऊन आपली दुकाने लावायची आहेत. त्यापूर्वी कोणीही शेतीमाल विक्रीसाठी ठेवायचा नाही. जर तसे आढळले तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

- खरेदीदार तसेच यार्डवर व्यवसाय करणारे व्यापारी यांनी यार्डचे उत्तरेकडील मोकळ्या जागेत आपली वाहने उभी करावयाची आहे. अमोल जलकुंभ समोर संध्याकाळी ५.३० चे अगोदर ज्या व्यापाऱ्यांची वाहने उभी असतील त्या वाहनांना जॅमर लावला लावण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com