
Mumbai News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कार्यरत असताना त्यांचा एकत्रित अनुभव पाहता त्यांनी पदाची शोभा केली, हे आम्ही पाहिले आहे, त्यांची भूमिका चुकीचीच होती,’’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
श्री. पवार म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्यामध्ये सध्याच्या राज्यकर्त्यांबाबत तीव्र भूमिका मांडली आहे. विधिमंडळ पक्ष हा अंतिम नसून ज्या पक्षातून तुम्ही निवडून येता त्या पक्षाचा आदेश अंतिम असतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. अजून काही निर्णय व्हायचे आहेत.
आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सूपूर्द केला आहे. अध्यक्षांना नियमांच्या चौकटीत काम करावे लागते. अध्यक्ष हे संविधानिक पद आहे. ते आपल्या पदाचे पावित्र्य राखतील. विशिष्ट काळात अपात्रतेचा मुद्दा निकाली काढावा असे न्यायालयाने म्हटले आहे. अध्यक्ष यासंबंधीची भूमिका देतील.’’
‘‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कार्यरत असताना त्यांनी आपल्या पदाची शोभा केली. त्यांचा एकतित्र अनुभव पाहता ते चुकीचेच वागले हे आपल्याला कळते. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदाचे पावित्र्य राखले पाहिजे. पण या निवडी होत असताना स्थानिक पक्ष आणि व्यक्तींना त्रास देणाऱ्या व्यक्तींची निवड करण्याची काळजी वरचे लोक घेतात, असे दिसते,’’ असे श्री. पवार म्हणाले.
‘भाजप आणि नैतिकतेचा काही संबंध नाही’
‘‘ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. त्याची कारणेही त्यांनी सांगितली. मात्र, आता नैतिकतेच्या पातळीवर सध्याच्या राज्यकर्त्यांनी राजीनामा द्यावा, असे कुणाला वाटत असेल तर भाजप आणि नैतिकतेचा काही संबंध नाही, हे नमूद करावे लागेल. ठाकरे यांनी राजीनामा देणे किंवा न देणे या बाबी आता मागे पडल्या आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्र लढू,’’ असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.