
Indrayani River Pollution आळंदी : येथील (ता. खेड) इंद्रायणी नदी (Indrayani River) रसायनयुक्त सांडपाणी (Chemical Water) सोडल्यामुळे पुन्हा फेसाळली. आठवड्यातून किमान दोनदा मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदी प्रदूषित (River Polution) होत आहे. हा गंभीर प्रश्न कायमचा मिटविण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे.
राज्यसरकार असेल किंवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ निवेदने घेऊन गप्प बसण्यापलीकडे काहीच कारवाई किंवा इंद्रायणी संवर्धनासाठी काम करत नसल्याचे चित्र आहे.
परिणामी आळंदीत नागरिकांना आणि भाविकांना मात्र प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना घाणेरड्या पाण्यातच तीर्थस्नान करावे लागत आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इंद्रायणीकाठच्या गावांमध्ये निर्माण झाला आहे
पिंपरी-चिंचवड महापिलिकेकडून लाखो रुपयांच्या निविदा जलपर्णी हटविण्यासाठी काढल्या जातात. दुसरीकडे चिखली कुदळवाडी भागातील येणारे सांडपाणी मात्र अडवण्यासाठी महापालिका काहीच करत नसल्याचे चित्र आहे.
देहू, तळेगाव, कामशेत एवढेच काय आळंदी पालिकादेखील सांडपाणी थेट नदीत सोडत आहे.
नदी संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळविल्याचा डंका मिरविणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतूनच दररोज लाखो लिटरचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट इंद्रायणी पात्रात मिसळले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.