
Rayat Kranti Sanghatna Farmer March : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेने कराड ते सातारा अशी पदयात्रा काढली आहे. यात्रेच्या चौथ्या दिवशी आज कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पुणे-बेंगलोर महामार्गावर ठिय्या मांडला दरम्यान, पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली.
चार दिवसांपासून रयत क्रांती संघटनेच्यावतीने कराड ते सातारा 'वारी शेतकऱ्यांची' ही पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेस ऊस वाहतूकदार संघटना आणि सरपंच परिषदेने पाठिंबा दिला. बुधवारी या पदयात्रेत मोठ्या संख्यने शेतकरी ट्रॅक्टर आणि ट्राॅली घेऊन सहभागी झाले होते.
पदयात्रेच्या चौथ्या दिवशी कांद्याचे दर पडल्याने माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेत सातारा शहरानजीक पुणे-बेंगलोर महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी रस्त्यावरून उठण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. ही पदयात्रा सातारा येथे पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा न निघाल्यास मोर्चा मुंबईला धडकणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.