
ॲग्रोवन वृत्तसेवा
Paddy News : भंडारा ः शेतकऱ्यांचे उन्हाळी धान खरेदी करून एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला असतानाही अद्याप चुकारे करण्यात आले नाही.
परिणामी, शेतकऱ्यांसमोर खरीप लागवडीकरीता (Kharif sowing) पैशाची तजवीज करण्याचे आव्हान आहे. शासनाने याची दखल घेत चुकारे खात्यात जमा करावे, अशी मागणी आहे.
यंदाच्या हंगामात शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत धानाची खरेदी करण्यात आली. लाखांदूर तालुक्यात तब्बल ४४ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली होती.
या केंद्रांना जिल्हा पणन विभागांतर्गंत गेल्या १ मेपासून धान खरेदीचे निर्देश होते. त्यानुसार, लाखांदूर तालुक्यातील मंजूर ४४ खरेदी केंद्रांपैकी ४१ केंद्रांवर उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली.
उर्वरित तीन खरेदी केंद्र चालकांनी उन्हाळी धान खरेदी केली नाही. तथापि, तालुक्यातील ४१ धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून १ मे ते १५ जूनपर्यंत तालुक्यातील २ हजार ८९५ शेतकऱ्यांकडून १ लाख ३८ हजार ६५७.४१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
ही खरेदी होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र त्यानंतर देखील शासनाकडून चुकारे करण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता
वाढली आहे.
गेल्या एका महिन्यात खरेदी केलेल्या धानाचे तब्बल २८ कोटी २८ लाख ६१ हजार ११६ रुपयांचे चुकारे थकित आहेत. शासनाने हे चुकारे त्वरित करावे, अशी मागणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.