Onion Auction Nashik : नाफेड आणि एनसीसीएफची चौकशी होणार, जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर

Nashik Onion Farmer : नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
Onion Auction Nashik
Onion Auction Nashikagrowon
Published on
Updated on

Nashik Farmers : मागच्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान एनसीसीएफ आणि नाफेड विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी करताना घोळ केला असल्याच्या तक्रारी शेतकरी व्यापारी यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे मांडल्या आहेत. याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफची चौकशी करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.

नाफेड, एनसीसीएफ या संस्थांनी किती कांदा खरेदी केला, कोणाकडून खरेदी केला, त्याला मोडवर किती दर दिला, अशा सर्वच बाबींची तपासणी नाफेड, एनसीसीएफ या संस्थांनी किती कांदा केली जाईल. त्यासाठी संबंधित तहसीलदारांना आदेश देत तत्काळ हा विषय निकाली काढला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारल्याने झपाट्याने दर पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी या विरोधात नाशिकमध्ये रान उठवले. अशातच केंद्राने २४०० रुपये मूल्य ठरवून दिल्यानंतर नाफेड आणि एनसीसीएफ यांनी व्यापाऱ्यांकडूनच कांदा खरेदी केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतरही यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही संस्थांची चौकशी करण्याबाबत पावले उचलली आहेत.

शेतकऱ्यांची कोंडी कायम?

जिल्हा व्यापारी असोसिएशनने राज्य व केंद्र सरकारकडे कळविलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० सप्टेंबरपासून जिल्ह्यात ४ दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत.

परिणामी जिल्ह्यात ६ लाख क्विंटलवर आवक तुंबली तर १०० कोटींवर उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे लिलाव सुरू होऊन पुन्हा आवक दाटल्यास फटका शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी वाढत आहे.

जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनची भूमिका, असोसिएशनने अल्टिमेटम देऊनही राज्य सरकारने निर्णय घेण्यात केलेला दिरंगाई व केंद्र सरकारची या मागण्यात प्रमुख भूमिका असताना या मागण्यांकडे केलेले दुर्लक्ष हे मुद्दे शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. यापूर्वी उत्पादन खर्चाच्या खाली दराने विक्री करण्याची वेळ आली, तर आता विक्री व्यवस्था अडचणीत आल्याने दुहेरी फटका शेतकऱ्यांनाच सोसावा लागत आहे.

जिल्ह्यातील कांदा व्यापारी व आडते यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना कांदा विक्री करताना अडचणी निर्माण झाल्या. यावर येवला (जि. नाशिक) दौऱ्यावर असताना पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता थेट लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com