रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे घटलेले आंबा उत्पादन (Mango Production) याची कारणमीमांसा व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीत रत्नागिरीत आंबा संशोधन केंद्र (Mango Research Center) उभारण्याबाबत मागणी करणार असल्याचे वायंगणी येथील शेतकरी अनिल शेलार यांनी सांगितले.
गेली चार-पाच वर्षे वायंगणीसह आजूबाजूच्या परिसरात आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच या परिसरात बागायतीमध्ये फळधारणेचे प्रमाण सातत्याने घटत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली.
याबाबत वायंगणी येथील शेतकरी आंबा बागायतदार असलेले अनिल शेलार यांनी घटलेले आंबा उत्पादन याबाबत कृषी खात्यासह पर्यावरण खात्याकडे तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेऊन नुकतीच वायंगणी परिसरात कृषी अधिकारी यांच्यासह आंबा बागायतदार आणि फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी यांची बैठक झाली.
या बैठकीला शेतकरी व बागायतदार उपस्थित होते. बागायतदारांच्या अडचणी लक्षात घेऊन कृषी अधिकाऱ्यांनी हापूस आंबा संशोधन केंद्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.